शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:32 IST

सिल्लोड तालुक्यातील पेंढगाव येथील घटना

श्यामकुमार पुरे, सिल्लोड: तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी गारींचा पाऊस झाला. त्यात पेंढगाव येथे दुपारी ३.३० वाजता लग्न लागत असतांना अचानक पाऊस आला व वाऱ्यामुळे लग्न मंडप उडल्याने वऱ्हाडी मंडळींची धावपळ झाली. यामुळे शेतात झालेल्या चिखलातून नवदेव-नवरीला खांद्यावर उचलून न्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

तळणी येथील नवरदेव अतुल ठोंबरे व पेंढगाव येथील वधू भाग्यश्री चिकटे यांचा पेंढगाव येथील एका शेतात मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र वऱ्हाड लग्न मंडपात ३.३० वाजता आले. लग्नाचे अर्धे मंगल अष्टक झाले अन् अचानक वादळी वाऱ्यासह गारिंचा पाऊस झाला. पावसातच लग्न लावण्यात आले, मात्र अचानक लग्नमंडप उडून गेला. 

त्यानंतर शेतात बाजूला असलेल्या एका खोलीत कसे बसे उर्वरित लग्न लावण्यात आले. त्यानंतर शेतात पावसामुळे चिखल झाला, त्यामुळे नवरदेव व नवरीला बाहेर रस्त्यावर येता येत नव्हते. गावातील काही तरुणांनी नवरदेव व नवरीला खांद्यांवर उचलून चिखलातून मार्ग काढून कसे बसे रस्त्यापर्यंत आणले, त्यानंतर वधू वर वाहनात बसवून तळणी येथे गेले.

शेवटी गावात एका ठिकाणी वऱ्हाडी मंडळीला थांबवून जेवण देण्यात आले. हे लग्न जर वेळेवर लागले असते, तर हा प्रकार झाला नसता. मात्र नवरदेवाकडील काही तळीरामांनी वरातीत नाचण्यासाठी हट्ट धरल्याने वऱ्हाड मंडपात उशिरा आले व त्यामुळे वऱ्हाडी मंडळी व नागरिकांना त्रास सहन करावा लागला, अशी माहिती एका प्रत्यक्ष दर्शीने लोकमतला दिली.

टॅग्स :sillod-acसिल्लोडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarriageलग्न