शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:32 IST

सिल्लोड तालुक्यातील पेंढगाव येथील घटना

श्यामकुमार पुरे, सिल्लोड: तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी गारींचा पाऊस झाला. त्यात पेंढगाव येथे दुपारी ३.३० वाजता लग्न लागत असतांना अचानक पाऊस आला व वाऱ्यामुळे लग्न मंडप उडल्याने वऱ्हाडी मंडळींची धावपळ झाली. यामुळे शेतात झालेल्या चिखलातून नवदेव-नवरीला खांद्यावर उचलून न्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

तळणी येथील नवरदेव अतुल ठोंबरे व पेंढगाव येथील वधू भाग्यश्री चिकटे यांचा पेंढगाव येथील एका शेतात मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र वऱ्हाड लग्न मंडपात ३.३० वाजता आले. लग्नाचे अर्धे मंगल अष्टक झाले अन् अचानक वादळी वाऱ्यासह गारिंचा पाऊस झाला. पावसातच लग्न लावण्यात आले, मात्र अचानक लग्नमंडप उडून गेला. 

त्यानंतर शेतात बाजूला असलेल्या एका खोलीत कसे बसे उर्वरित लग्न लावण्यात आले. त्यानंतर शेतात पावसामुळे चिखल झाला, त्यामुळे नवरदेव व नवरीला बाहेर रस्त्यावर येता येत नव्हते. गावातील काही तरुणांनी नवरदेव व नवरीला खांद्यांवर उचलून चिखलातून मार्ग काढून कसे बसे रस्त्यापर्यंत आणले, त्यानंतर वधू वर वाहनात बसवून तळणी येथे गेले.

शेवटी गावात एका ठिकाणी वऱ्हाडी मंडळीला थांबवून जेवण देण्यात आले. हे लग्न जर वेळेवर लागले असते, तर हा प्रकार झाला नसता. मात्र नवरदेवाकडील काही तळीरामांनी वरातीत नाचण्यासाठी हट्ट धरल्याने वऱ्हाड मंडपात उशिरा आले व त्यामुळे वऱ्हाडी मंडळी व नागरिकांना त्रास सहन करावा लागला, अशी माहिती एका प्रत्यक्ष दर्शीने लोकमतला दिली.

टॅग्स :sillod-acसिल्लोडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarriageलग्न