शहरात आणखी दहा चौकांत सिग्नल
By Admin | Updated: February 17, 2015 00:43 IST2015-02-17T00:34:16+5:302015-02-17T00:43:46+5:30
औरंगाबाद : वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील आणखी दहा चौकांत सिग्नल बसविले जाणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती(डीपीडीसी) कडून महानगरपालिकेला ५३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

शहरात आणखी दहा चौकांत सिग्नल
औरंगाबाद : वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील आणखी दहा चौकांत सिग्नल बसविले जाणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती(डीपीडीसी) कडून महानगरपालिकेला ५३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दहा सिग्नलसाठी एकूण १ कोटी ६ लाख रुपये खर्च येणार आहे. उर्वरित ५३ लाख रुपयांचा खर्च मनपा उचलणार आहे.
औरंगाबाद शहरात सध्या ३२ ठिकाणी सिग्नल आहेत. अनेक चौकांत वाहतूक सिग्नल नसल्यामुळे तेथे नेहमी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दहा नवीन ठिकाणी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव मनपाने तयार केला असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी देण्याची मागणी केली होती.
या विषयावर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक पार पडली. बैठकीला मनपा आयुक्त प्रकाश महाजन, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह तसेच महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते. दहा सिग्नलसाठी एकूण १ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यापैकी ५३ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करण्यात आला आहे. हा निधी चालू महिन्यातच मनपाला दिला जाईल.