शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे २५ कोटी पाण्यात; यंत्रणांचे एकमेकांवर आरोप, तज्ज्ञांनी काढले मुर्खात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:26 IST

काम सुरू करण्यापूर्वीच पाणी निचऱ्याचे नियोजन हवे होते

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वे फाटकावर छोटा उड्डाणपूल बांधावा, ही अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. रेल्वे प्रशासन आणि सा. बां. विभागाने पूल रद्द करून भुयारी मार्गाचे नियोजन केले. २५ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचे परिणाम शहरवासीयांना भोगावे लागत आहेत. भुयाराचे काम सुरू करतानाच पावसाच्या पाणी निचऱ्याचे नियोजन, आर्थिक तरतूद करावी लागते. त्याच्याशिवाय काम पुढे सरकतच नाही. आता संपूर्ण काम झाल्यावर शासकीय यंत्रणांनी एकमेकांवर आरोप करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा म्हणावा लागेल, अशा शब्दात तज्ज्ञ अभियंत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पावसाचा अभियंत्यांनी अभ्यास केला का?या भागातील काही वर्षांतील पावसाची सर्वोच्च आकडेवारी गृहीत धरूनच स्टॉर्म वॉटरचे नियोजन करावे लागते. एका तासात किती पाऊस पडतो, हे तरी गृहीत धरायला हवे. शिवाजीनगर येथे तज्ज्ञ अभियंत्यांनी अभ्यास केला नाही का? पावसाचे पाणी कुठे न्यायचे हे अधिकाऱ्यांनी अगोदरच ठरवायला हवे होते. झालेले काम अत्यंत चुकीचे आहे. भुयारी मार्गाची उभारणी करताना सांडपाण्याची लाइन कोठून जाणार, हे अगोदर का ठरले नाही? जिथे नियोजन होते तेथे एका रात्रीतून जलवाहिनी, विजेची केबल आली का? इतके दिवस अधिकारी काय करीत होते, असे मत मनपातील निवृत्त शहर अभियंता सी. एस. सोनी यांनी व्यक्त केले.

उड्डाणपूल का रद्द केला?येथे अगोदर छोटा पूल उभारावा, अशी मागणी होती. पण शिवाजीनगर ते देवळाई चाैक लांबी खूप कमी, असा मुद्दा निघाला. वास्तविक पाहता पूल बांधला असता तर आज मोठी वाहने गेली असती, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता, मनपाला सहा कोटी खर्च करून भूसंपादन करावे लागले नसते. मुळात भुयारी मार्गही अत्यंत कमी जागेत उभारला. पावसाचे पाणी नेण्यासाठी जागाच शिल्लक नाही. प्रकल्पाचा आराखडा तयार करताना या बारीक गोष्टींचे नियोजन असते. तज्ज्ञ अभियंते तेव्हा झोपा काढत होते का? आज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नागरिकांना त्रास होतोय त्याचे काय? असा सवाल मनपाचे निवृत्त शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांनी केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी