शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

गावे टँकरमुक्त करण्यासाठी शिवजलक्रांती

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण सरकारी यंत्रणेला मर्यादा असल्याने उर्वरित गावांनाही न्याय मिळावा,

जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण सरकारी यंत्रणेला मर्यादा असल्याने उर्वरित गावांनाही न्याय मिळावा, या हेतूने शिवसेनेच्या वतीने शिवजल क्रांती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे मराठवाड्यातील अनेक गावांत पाणीटंचाई दूर हेईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी पत्र परिषदेत व्यक्त केला.जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या. पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार आम्ही विविध उपक्रम राबवित असून, पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत. त्यापैकी शिवजलक्रांती हा उपक्रम असल्याचे देसाई म्हणाले. पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ५ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवडली आहेत. पण टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी असल्याने केवळ टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची जबाबदारी शिवसेनेने उचलत तेथे शिवजल क्रांती उपक्रम राबवत आहे. राज्यात अनेक वर्षांपासून मोठ्या धरणांची कामे रखडली आहेत. यामध्ये पाणी काही जिरले नाही, मात्र पैसा मोठ्या प्रमाणात जिरल्याचे टीकाही त्यांनी यावेळी केली. मराठवाड्यात २००० हेक्टर हे लागवडीचे क्षेत्र आहे. मात्र, केवळ ५०० हेक्टर क्षेत्रात पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर सिंचनांची कामे करावी लागणार आहे. यासाठी ही लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. यासाठी स्वयंसेवी संस्था व जलतज्ज्ञांचीही मदत घेतली असून, लाहोटी आणि प्रफुल्ल कदम हे मार्गदर्शन करीत आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना करण्यात आली असून, याद्वारे दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अशा सर्व शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वितरित केले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. पत्र परिषदेस आमदार अर्जुन खोतकर, संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर , ए.जे. बोराडे, शिवाजी चोथे, औरंगाबादचे अंबादास दानवे, माजी आ. संतोष सांबरे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाळा परदेशी, संतोष मोहिते, दिनेश फलके आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पक्षाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून, यामध्ये ई- प्रबोधन, शुद्ध पाणी पुरवठा, सोलार दिवे आदींचा समावेश असणार आहे. ४अनुशेष दूर करण्यापेक्षा प्रश्न सुटले पाहिजेत ही पक्षाची भूमिका असून, त्या दृष्टिनेच विविध समाजपयोगी उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबविले जात असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. ४जालना तालुक्यातील नाव्हा, बाजी उम्रद, वखारी या गावांतील सुमारे ३०० बंधारे, नाले व बांधबदिस्ताची खोली वाढविण्यात आली. आमदार अर्जुन खोतकर यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे परिसरात जलसाठा वाढल्याचे देसाई म्हणाले. हा उपक्रम न राहता एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.