शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
2
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
3
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठे आर्थिक विधेयक संसदेत होणार सादर
4
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
5
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
6
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
7
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
8
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
9
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
10
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
11
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
12
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
13
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
14
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
15
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
16
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
17
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
18
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
19
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
20
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
Daily Top 2Weekly Top 5

गावे टँकरमुक्त करण्यासाठी शिवजलक्रांती

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण सरकारी यंत्रणेला मर्यादा असल्याने उर्वरित गावांनाही न्याय मिळावा,

जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण सरकारी यंत्रणेला मर्यादा असल्याने उर्वरित गावांनाही न्याय मिळावा, या हेतूने शिवसेनेच्या वतीने शिवजल क्रांती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे मराठवाड्यातील अनेक गावांत पाणीटंचाई दूर हेईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी पत्र परिषदेत व्यक्त केला.जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या. पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार आम्ही विविध उपक्रम राबवित असून, पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत. त्यापैकी शिवजलक्रांती हा उपक्रम असल्याचे देसाई म्हणाले. पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ५ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवडली आहेत. पण टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी असल्याने केवळ टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची जबाबदारी शिवसेनेने उचलत तेथे शिवजल क्रांती उपक्रम राबवत आहे. राज्यात अनेक वर्षांपासून मोठ्या धरणांची कामे रखडली आहेत. यामध्ये पाणी काही जिरले नाही, मात्र पैसा मोठ्या प्रमाणात जिरल्याचे टीकाही त्यांनी यावेळी केली. मराठवाड्यात २००० हेक्टर हे लागवडीचे क्षेत्र आहे. मात्र, केवळ ५०० हेक्टर क्षेत्रात पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर सिंचनांची कामे करावी लागणार आहे. यासाठी ही लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. यासाठी स्वयंसेवी संस्था व जलतज्ज्ञांचीही मदत घेतली असून, लाहोटी आणि प्रफुल्ल कदम हे मार्गदर्शन करीत आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना करण्यात आली असून, याद्वारे दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अशा सर्व शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वितरित केले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. पत्र परिषदेस आमदार अर्जुन खोतकर, संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर , ए.जे. बोराडे, शिवाजी चोथे, औरंगाबादचे अंबादास दानवे, माजी आ. संतोष सांबरे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाळा परदेशी, संतोष मोहिते, दिनेश फलके आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पक्षाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून, यामध्ये ई- प्रबोधन, शुद्ध पाणी पुरवठा, सोलार दिवे आदींचा समावेश असणार आहे. ४अनुशेष दूर करण्यापेक्षा प्रश्न सुटले पाहिजेत ही पक्षाची भूमिका असून, त्या दृष्टिनेच विविध समाजपयोगी उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबविले जात असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. ४जालना तालुक्यातील नाव्हा, बाजी उम्रद, वखारी या गावांतील सुमारे ३०० बंधारे, नाले व बांधबदिस्ताची खोली वाढविण्यात आली. आमदार अर्जुन खोतकर यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे परिसरात जलसाठा वाढल्याचे देसाई म्हणाले. हा उपक्रम न राहता एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.