शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
4
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
5
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
6
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
7
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
8
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
9
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
11
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
12
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
13
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
14
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
15
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
16
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
17
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
18
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
19
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
20
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:36 IST

आता जिल्ह्याच्या विकासाचे मोठे आव्हान

ठळक मुद्देजिल्ह्यात ३० वर्षांचा इतिहासात जनतेने भरभरून दिले

- विकास राऊत 

औरंगाबाद : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्ह्याच्या ३० वर्षांतील कारकीर्दीत पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पक्षाला नऊपैकी  सहा जागा पटकावता आल्या आहेत. पक्षाच्या दृष्टीने हा इतिहास घडला आहे.  

शिवसेनेची औरंगाबाद जिल्ह्यामधील विधिमंडळातील कारकीर्द सुमारे ३० वर्षांची आहे. १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून बबनराव वाघचौरे हे शिवसेनेकडून विजयी झाले,  तर गंगापूरमधून कैलास पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा फडकाविला. ग्रामीण भागात पहिल्यांदाच शिवसेनेला दोन जागा त्यावेळी मिळाल्या. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे पहिले आमदार ठरले. जिल्ह्यात त्यावेळी शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले आणि तो त्यावेळचा पक्षाचा इतिहास ठरला. औरंगाबाद पूर्वमधून हरिभाऊ बागडे विजयी झाल्याने युतीच्या ४ जागा झाल्या होत्या. 

१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून चंद्रकांत खैरे या दोनच जागा शिवसेनेला जिंकता आल्या. त्या निवडणुकीत राज्यात युतीचे सरकार आले मात्र गंगापूरची जागा  शिवसेनेला गमवावी लागली. 

१९९९ साली लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या. यात गंगापूर येथून शिवसेनेचे अण्णासाहेब माने, वैजापुरातून आर. एम. वाणी आणि पैठणमधून संदीपान भुमरे हे विजयी झाले. कन्नड आणि औरंगाबाद पश्चिमची जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. यावेळीही शिवसेनेचे तीनच आमदार होते. 

२००४ सालच्या विधानसभा कुरुक्षेत्रात पैठणमधून भुमरे, गंगापूरमधून माने, वैजापूरमधून वाणी, कन्नडमधून नामदेव पवार विजयी झाले. औरंगाबाद पश्चिम शिवसेनेला जिंकता आले नाही. २००४ ची जिल्ह्यातील शिवसेना आमदारांची संख्या चार होती. 

२००९ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली.  या निवडणुकीत वैजापूरमधून वाणी आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट हे दोनच शिवसेनेचे शिलेदार विधानसभेत गेले. पैठण, गंगापूर, औरंगाबाद मध्य, पूर्व, फुलंब्री, सिल्लोड या जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट, कन्नडमधून हर्षवर्धन जाधव हे विजयी झाले. या वेळची शिवसेना आमदारांची संख्या तीन इतकी होती. 

२०१९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या दृष्टीने इतिहास घडला. जिल्ह्यात नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपचेही तीन आमदार निवडून आल्याने युतीची निर्विवाद सत्ता जिल्ह्यावर निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात शिवसेना ठरला मोठा भाऊ २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत लढले. पहिल्यांदाच शिवसेनेला सिल्लोडमध्ये यश मिळाले. तेथे भाजपची दावेदारी असताना सेनेने मुसंडी मारून जागा पदरात पाडली. आ.अब्दुल सत्तार विजयी झाले. भाजपच्या  वाट्याला फुलंब्री, औरंगाबाद पूर्व, गंगापूर मतदारसंघ आले. त्या जागा भाजपने जिंकल्या, तर शिवसेनेला कन्नड, वैजापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, पैठण, सिल्लोड या जागांवर शंभर टक्के यश मिळाले. जिल्ह्यात पहिल्यादांच शिवसेना राजकीयदृष्ट्या मोठा भाऊ ठरला आहे. ९ पैकी ९ जागा महायुतीच्या ताब्यात गेल्या आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019