शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:36 IST

आता जिल्ह्याच्या विकासाचे मोठे आव्हान

ठळक मुद्देजिल्ह्यात ३० वर्षांचा इतिहासात जनतेने भरभरून दिले

- विकास राऊत 

औरंगाबाद : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्ह्याच्या ३० वर्षांतील कारकीर्दीत पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पक्षाला नऊपैकी  सहा जागा पटकावता आल्या आहेत. पक्षाच्या दृष्टीने हा इतिहास घडला आहे.  

शिवसेनेची औरंगाबाद जिल्ह्यामधील विधिमंडळातील कारकीर्द सुमारे ३० वर्षांची आहे. १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून बबनराव वाघचौरे हे शिवसेनेकडून विजयी झाले,  तर गंगापूरमधून कैलास पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा फडकाविला. ग्रामीण भागात पहिल्यांदाच शिवसेनेला दोन जागा त्यावेळी मिळाल्या. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे पहिले आमदार ठरले. जिल्ह्यात त्यावेळी शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले आणि तो त्यावेळचा पक्षाचा इतिहास ठरला. औरंगाबाद पूर्वमधून हरिभाऊ बागडे विजयी झाल्याने युतीच्या ४ जागा झाल्या होत्या. 

१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून चंद्रकांत खैरे या दोनच जागा शिवसेनेला जिंकता आल्या. त्या निवडणुकीत राज्यात युतीचे सरकार आले मात्र गंगापूरची जागा  शिवसेनेला गमवावी लागली. 

१९९९ साली लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या. यात गंगापूर येथून शिवसेनेचे अण्णासाहेब माने, वैजापुरातून आर. एम. वाणी आणि पैठणमधून संदीपान भुमरे हे विजयी झाले. कन्नड आणि औरंगाबाद पश्चिमची जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. यावेळीही शिवसेनेचे तीनच आमदार होते. 

२००४ सालच्या विधानसभा कुरुक्षेत्रात पैठणमधून भुमरे, गंगापूरमधून माने, वैजापूरमधून वाणी, कन्नडमधून नामदेव पवार विजयी झाले. औरंगाबाद पश्चिम शिवसेनेला जिंकता आले नाही. २००४ ची जिल्ह्यातील शिवसेना आमदारांची संख्या चार होती. 

२००९ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली.  या निवडणुकीत वैजापूरमधून वाणी आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट हे दोनच शिवसेनेचे शिलेदार विधानसभेत गेले. पैठण, गंगापूर, औरंगाबाद मध्य, पूर्व, फुलंब्री, सिल्लोड या जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट, कन्नडमधून हर्षवर्धन जाधव हे विजयी झाले. या वेळची शिवसेना आमदारांची संख्या तीन इतकी होती. 

२०१९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या दृष्टीने इतिहास घडला. जिल्ह्यात नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपचेही तीन आमदार निवडून आल्याने युतीची निर्विवाद सत्ता जिल्ह्यावर निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात शिवसेना ठरला मोठा भाऊ २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत लढले. पहिल्यांदाच शिवसेनेला सिल्लोडमध्ये यश मिळाले. तेथे भाजपची दावेदारी असताना सेनेने मुसंडी मारून जागा पदरात पाडली. आ.अब्दुल सत्तार विजयी झाले. भाजपच्या  वाट्याला फुलंब्री, औरंगाबाद पूर्व, गंगापूर मतदारसंघ आले. त्या जागा भाजपने जिंकल्या, तर शिवसेनेला कन्नड, वैजापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, पैठण, सिल्लोड या जागांवर शंभर टक्के यश मिळाले. जिल्ह्यात पहिल्यादांच शिवसेना राजकीयदृष्ट्या मोठा भाऊ ठरला आहे. ९ पैकी ९ जागा महायुतीच्या ताब्यात गेल्या आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019