शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

शिवसेना-भाजप युतीने वाढविली पाणीपट्टी; २०३१ मध्ये १५ हजार रुपये करण्यास दिली होती मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 13:08 IST

औरंगाबादकरांनी निवडून दिलेल्या ११५ नगरसेवकांनी २०११मध्ये दरवर्षी पाणीपट्टीत १० टक्के वाढ करण्याच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरात सध्या पाणीप्रश्न कमालीचा पेटला आहे. नळाला पाणीच येत नसेल, तर ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी तरी कशासाठी घेता, अशी ओरड सर्वसामान्यांकडून सुरू आहे. त्यामुळे पन्नास टक्के पाणीपट्टी कमी करण्याची मागणी राजकीय मंडळींकडून शासनाला करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, औरंगाबादकरांनी निवडून दिलेल्या ११५ नगरसेवकांनी २०११मध्ये दरवर्षी पाणीपट्टीत १० टक्के वाढ करण्याच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. या ठरावानुसार २०२२-२३मध्ये पाणीपट्टी ६ हजार ५०० रुपये वसूल करावी तर २०३२-३३मध्ये तब्बल १५ हजार ३०० रुपये पाणीपट्टी ठेवावी, असेही त्यात म्हटले आहे.

जायकवाडीहून औरंगाबाद शहरात मुबलक पाणी आणण्यासाठी महापालिकेतील तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या कारभाऱ्यांनी खासगी कंपनीला पाचारण केले होते. या कंपनीच्या हितासाठी अक्षरश: रेड कार्पेट अंथरून ठेवण्यात आले होते. त्याचे एक उदाहरण म्हणजे ७ सप्टेंबर २०११ रोजी सर्वसाधारण सभेत खास कंपनीसाठी पाणीपट्टी दरवाढीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. २० वर्षांसाठी ही दरवाढ असल्याचे ठरावात म्हटले आहे. हा ठराव मंजूर करताना पाणीपट्टी फक्त २,५०० रुपये होती. त्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ करावी, या ठरावानुसार मनपा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली. पाणीपट्टी ४ हजार ५० रुपयांपर्यंत आल्यावर २०१७-१८ या आर्थिक वर्षात कंपनीची हकालपट्टी करण्यात आली.

एकीकडे कंपनीसाठी भरमसाठ पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतला होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. औरंगाबादकरांवर पाणीपट्टीचा बोजा वाढविणारेच आता पाणीपट्टी कमी करा, अशी मागणी करत आहेत. दुसरीकडे, पाणीपट्टी दरवाढीचे उपविधी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. शासनानेही त्याला मंजुरी दिली. आता हे उपविधी रद्द करायचे कसे, असा खल सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहे.

व्यावसायिक कनेक्शनधारकांचे मरणचव्यवसायिक नळ कनेक्शनधारकांना २०२२-२३मध्ये ३२ हजार ४५० रुपये पाणीपट्टीत वाढ करण्यास मुभा दिली होती. दरवर्षी १० टक्के वाढ म्हणजे २०३१-३२मध्ये ही दरवाढ ७६ हजार ४५० रुपये करण्याचे ठरावात म्हटले आहे.

निवासी पाणीपट्टी दरवाढ२०१८-१९ - ४,४५०२०१९-२० - ४,९००२०२०-२१ - ५,४००२०२१-२२ - ५,९००२०२२-२३ - ६,५००२०२३-२४ - ७,१५०२०२४-२५ - ७,८५०२०२५-२६ - ८,६५०२०२६-२७ - ९,५००२०२७-२८ - १०,४५०२०२८-२९ - ११,५००२०२९-३० - १२,६५०२०३०-३१ - १३,९००२०३१-३२ - १५,३००

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी