शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

चार हजार जणांचे व-हाड जाणार शिर्डीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 9:40 PM

शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे.

विजय सरवदेऔरंगाबाद : शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्चून राज्य परिवहन मंडळाच्या ८० बसेस आरक्षित केल्या आहेत.

शुक्रवारी श्रीसाई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आहे. या कार्यक्रमाचा मुहूर्त साधून राज्य सरकारने शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घरकुलांच्या ई- प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले आहे. राज्य सरकारने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी दिसली पाहिजे म्हणून की काय, प्रत्येक जिल्ह्यातून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारी पैशातून नेले जाणार आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. यापैकी २ हजार घरकुलांचे लाभार्थी व त्यांच्यासोबत प्रत्येकी एक नातेवाईक असे एकूण ४ हजार जणांना शिर्डीला नेण्यासाठी सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

शिर्डीला नेण्यात येणारे २ हजार लाभार्थी व त्यांचे २ हजार नातेवाईक, अशा ४ हजार नागरिकांच्या प्रवासासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ८० बसेस आरक्षित केल्या आहेत. बस व नाश्ता-पाण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला शासनाकडून निधीदेखील प्राप्त झाला आहे. प्रती बस १५ हजार रुपयांप्रमाणे ८० बसेससाठी १२ लाख रुपये व सरकारी वºहाडाच्या नाश्ता- पाण्यासाठी वेगळा निधी मिळाला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच परिवहन मंडळाच्या बसेस तालुका तसेच मोठ्या गावांमध्ये दाखल होतील. तेथून शिर्डीला नेण्यात येणारे लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांना बसमध्ये घेऊन जाण्यासाठी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंते व अन्य सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या उपक्रमावर गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे.

जिल्ह्यात सहा हजार घरकुले पूर्णयासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेला सन २०१६-१७ पासून प्रारंभ झाला. सन २०२२ पर्यंत २१ हजार ३०६ घरकुले उभारली जाणार आहेत. तीन वर्षांत १० हजार २०५ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, आजपर्यंत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. घरकुल उभारण्यासाठी प्रती लाभार्थी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान टप्प्या टप्प्याने दिले जाते.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद