शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

दहावीत नापास होण्याच्या धास्तीने तिने केली आत्महत्या, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 9:05 PM

साक्षी पांढरे ही विश्वभारती कॉलनीतील जय भवानी विद्यामंदिर शाळेत शिकत होती.

औरंगाबाद : दहावी परिक्षेचा निकाल लागण्याच्या चार दिवस आधीच परीक्षेत नापास होण्याच्या भीतीपोटी आत्महत्या करणारी साक्षी अशोक पांढरे (वय १५, रा.विजयनगर, गारखेडा परिसर) ही उत्तीर्ण झाल्याचे समोर आले. दहावी बोर्ड परीक्षेचा शनिवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला तेव्हा साक्षी ५३.६० टक्के गुण मिळाले पास झाल्याचे समोर आले.

गारखेडा परिसरातील विजयनगर येथील रहिवासी साक्षी पांढरे ही विश्वभारती कॉलनीतील जय भवानी विद्यामंदिर शाळेत शिकत होती. मार्च महिन्यात तीने दहावीची परिक्षा दिली होती. परिक्षेत पेपर अवघड गेल्याने परिक्षेनंतर साक्षी नाराज होती. मात्र नंतर ती पूर्ववत झाली होती. दरम्यान बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा सुरू झाली. तेव्हापासून साक्षी मानसिक तणावात होती. आपण नापास होऊ अशी भीती तिला वाटत होती. नापास होण्याच्या धास्तीतच  ३ जून रोजी  सकाळी आई-वडील घरी नसताना साक्षीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. 

साक्षीचे वडील अशोक पांढरे  हे वाहनचालक आहे तर तिची आई आई धुण्या-भांड्याचे काम करून संसाराला हातभार लावते. तर तिचा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.  साक्षीने आत्महत्या केल्यापासून पांढरे कुटुंब दु:खात बुडाले आहे. शनिवारी दहावीचा निकाल ऑनलाइन घोषित झाला. तेव्हा तिच्या भावाने साक्षीचे हॉल तिकिटवरील तिचा क्रमांक पाहून तिचा निकाल पाहिला तेव्हा साक्षीला ५३.६० टक्के गुण मिळाल्याचे त्याला दिसले.  हा निकाल पाहून नातेवाईकांना पुन्हा साक्षीच्या आठवणीने भूतकाळात नेले.

टॅग्स :examपरीक्षा