शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

'हे सरकार फसवं आहे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं'; शरद पवारांचा सरकारवर 'हल्लाबोल' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 5:51 PM

हे सरकार फसवं आहे, ते केवळ आश्वासनं देतं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला लगावला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेची औरंगाबादेत सांगता झाली.

औरंगाबाद  - हे सरकार फसवं आहे, ते केवळ आश्वासनं देतं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला लगावला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेची औरंगाबादेत सांगता झाली. यावेळी शरद पवारांनी सरकरावर जोरदार हल्लाबोल करत तीव्र शब्दात समाचार घेतला. शेतमालाला हमीभाव हे लबाडाघरचं आवतान असल्याचंही शरद पवार बोलले आहेत. 

सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याची टीकाही शरद पवारांनी यावेळी केली. सरकार शेतकऱ्यांची वीज तोडतंय. पाणी देत नाही, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका करत तीव्र शब्दांत त्यांनी आपला निषेध नोंदवला. राज्यातील महत्त्वाच्या कापसाच्या पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही असंही शरद पवारांनी म्हटलं. 

नोटाबंदीमुळे उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला, याला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याची टीका शरद पवारांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या पिकाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेवरुनही शरद पवारांनी सरकारला लक्ष्य केलं. घोषणा तर केली, मात्र, हा हमीभाव कसा देणार, याचं विश्लेषण अर्थसंकल्पात केलं नसल्याचं पवार म्हणाले. 

औरंगाबादमधली इंटरनेट सेवा बंद करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा समारोप आज औरंगाबादेत झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा झाली. समारोपाच्या रॅलीला विधान परिषदेतील उपनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस