शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही?; चंद्रकांत खैरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:04 IST

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना सवाल विचारला आहे.

औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत आहे. मात्र माझ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना सांभाळा, असं आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. मग बंडखोर आमदार आणि खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त नावाचा वापर करायचा असून त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही घेणंदेणं नसल्याचं यावरुन दिसून येत आहे. जर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विचार समोर आला असता तर त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलीच नसती, असंही चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांच्या गटांनी सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणीही वक्तव्य करणार नाही. मात्र औरंगाबादमधील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट ठाकरे कुटुंब विरुद्ध वक्तव्य करताना दिसून येत आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात वक्तव्य करू नाही, असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली- शिवसेनेचे नेते संजय राऊत

बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, ज्या माणसांना सरदार केलं त्यांनीच धक्का दिला, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आता शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच "ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. चुका सगळीकडेच होत असतात, कुटुंबातही होतात. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. ठाकरे कुटुंब कमकुवत करण्याचा काहींचा मनसुबा आहे" असं म्हटलं आहे.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे