शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जप्त ऐवजाचे तक्रारदारच मिळेना; विविध पोलीस ठाण्यात २५ वर्षांपासून ऐवज पडून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:27 IST

पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला किमती मुद्देमाल २० ते २५ वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला किमती मुद्देमाल २० ते २५ वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार सापडत नसल्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतरही ज्याच्या वस्तू त्याला परत करणे पोलिसांना शक्य झाले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले; मात्र  तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी विशेष कार्यवाही सुरू केली. 

औरंगाबाद शहरात १७ पोलीस ठाणी आहेत. यातील हर्सूल, वेदांतनगर, पुंडलिकनगर आणि दौलताबाद ही ठाणी नुकतीच स्थापन झालेली आहेत. उर्वरित पोलीस ठाणी अस्तित्वात येऊन तीसहून अधिक वर्षे झाली आहेत. सिटीचौक, क्रांतीचौक, छावणी आणि सिडको, वाळूज, एमआयडीसी वाळूज, सिडको एमआयडीसी आणि उस्मानपुरा, सातारा ही जुनी ठाणी आहेत. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरी, चोरी, घरफोडी, वाटमारी, जबरी चोरी आदी प्रकारचे दरवर्षी सुमारे हजार गुन्हे नोंद होतात.

यातील गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण २० ते २२ टक्क्यांपर्यंत आहे. गुन्ह्यांची उकल झाल्यानंतर आरोपींकडून जप्त केलेले दागिने, वस्तू न्यायालयाच्या परवानगीने तक्रारदाराला परत करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. असे असताना शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत विविध ठाण्यांत अनेक वर्षांपासून हजारो तक्रारदारांच्या किमती वस्तू जमा आहेत. तक्रारदार सापडत नसल्याने त्यांना त्यांच्या वस्तू परत करता आलेल्या नाहीत, असे कारण संबंधित अधिकाऱ्यांकडून कालपर्यंत दिले जाई.

पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी शहर पोलिसांकडून सुरू झाली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार आता सर्व ठाण्यांतील किमती माल तक्रारदारांना देण्यासाठी विशेष प्रक्रिया सुरू करण्यात आली. याअंतर्गत सिडको पोलिसांनी मागील सप्ताहात एका कार्यक्रमात तक्रारदारांना त्यांचा किमती ऐवज परत केला. वीस वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने महिलेला पोलिसांनी परत केले. 

तक्रारदार सापडत नाहीत हे एकमेव कारणबऱ्याचदा तक्रारदार हे त्यांच्या पत्त्यावर राहत नाहीत. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी प्रत्येकाकडे मोबाईल नव्हता. यामुळे बहुतेक तक्रारदाराकडे मोबाईल अथवा फोन नव्हता. त्यामुळे त्यांच्या संपर्क नंबरची नोंद तक्रारीसोबत पोलिसांना घेता आलेली नाही. शिवाय बऱ्याचदा तक्रारदार हे कामधंद्यानिमित्त दुसऱ्या शहरात स्थलांतरित होतात. त्यांनी बदललेल्या रहिवासी पत्त्याची माहिती पोलिसांकडे नसते.   

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी