शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 7:58 PM

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.

दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह आहे. औरंगाबादमध्ये इतर सत्रात सुट्या कमी असल्याने, दिवाळीतील सुट्या अधिक असतात. २१ दिवसांच्या सुटीच्या विश्रांतीनंतर शाळा सुरू होणार असल्याने शाळांनीही तयारी केली आहे. शाळा सोमवारी सुरू होत असल्याचे संदेश पालकांना मोबाइलवर पाठविण्याची सुविधाही काही शाळांनी केली आहे. अनेक शाळांत मुलांचे गुलाबपूष्प देऊन स्वागत करण्यात आले.

पूर्वसंध्येला शाळांनी वर्गांची साफसफाई केली. सुट्यानंतर नियमितपणे वर्ग भरणार असल्याने तशी तयारी आणि पहिल्या सत्रातील परीक्षांमधील गुण ही विद्यार्थ्यांना अनेक शाळांमध्ये कळविण्यात येतात. दिवाळी सुट्यात दिलेले होमवर्कही तपासण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य आणि स्थलांतर विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठभ शिक्षण विभागाकडून पहिल्याच दिवशी आढावा घेण्यात आला.

प्रत्येक शाळेतील शिक्षकांना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. स्थलांतर रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १०० टक्के स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात येणार असून, त्यासाठी बालरक्षक पथके राज्यभरात फिरत असल्याची माहिती जि.प.प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाविद्यालयातील शैक्षणिक सत्रालाही सुरूवात झाली. तासिकांनाही सुरूवात करण्यात आली असून,यात काही ठिकाणी परीक्षांही सुरू आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद