शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बारावी परीक्षेत घोटाळा! ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे केली पूर्ण, उत्तरपत्रिकेत ‘फाॅर्म्युला’ लेखन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 19:43 IST

एक-एक विद्यार्थी चौकशीसाठी आतमध्ये जात होता. त्यावेळी पालकांचा जीव टांगणीला लागत होता.

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांत दुसऱ्याचेच हस्ताक्षर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारपासून याप्रकरणी शिक्षण मंडळाने चौकशी सुरू केली असून, बुधवारी ७४ पैकी ७१ विद्यार्थी चौकशीला हजर राहिले. यात काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे पूर्ण करण्यात आल्याचे आणि काहींच्या पेपरमध्ये ‘फाॅर्म्युला’ लेखन आढळले आहे.

परीक्षेनंतर कस्टडीतून मॉडरेटरांकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या जातात. त्यांच्याकडून मुख्याध्यापकांमार्फत तपासनीसांकडे जाते. नंतर पुन्हा मॉडरेटरकडे उत्तरपत्रिका येतात. तेव्हा माॅडरेटर उत्तरपत्रिकांची पडताळणी करतात. त्या दरम्यान हस्ताक्षर बदल झाल्याचा प्रकार निदर्शनाला आला आणि ही बाब शिक्षण मंडळाला कळविण्यात आली. मग विद्यार्थ्यांची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीसाठी बोलावलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एक-एक विद्यार्थी चौकशीसाठी आतमध्ये जात होता. त्यावेळी पालकांचा जीव टांगणीला लागत होता. मुलाला तर पेपर सोपा गेला होता, मग हा प्रकार कसा झाला, असा प्रश्न पालकांना पडला.

कोणी कविता लिहिली, कोणी उत्तरपत्रिका फाडली,

५०० विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात हस्ताक्षर बदलाबरोबरच काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत कविता लिहिलेली तसेच इतर मजकूर होता तर काहींची उत्तरपत्रिका फाडलेली होती. अशा एकूण ५०० विद्यार्थ्यांची १३ तारखेपर्यंत चौकशी होईल.

प्रत्येक प्रश्नाला विद्यार्थ्यांचे उत्तर ‘नाही’चौकशीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात ‘तुम्हाला आरोप मान्य आहे का’, ‘गुन्हा मान्य आहे का’, ‘उत्तरपत्रिकेतील अक्षर तुमचेच आहे का’, अशा प्रश्नांची विचारणा करण्यात येत आहे. त्यावर ‘नाही’ असेच विद्यार्थी सांगत आहेत. उत्तरपत्रिकेत ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे कोणी तरी पूर्ण केल्याचे, उत्तरपत्रिकेच्या मध्यभागी, शेवटच्या पानावर ‘फाॅर्म्युला’ लेखन केल्याचे आढळले, असे विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उत्तराशिवाय इतर काही लिहिले तर चौकशीउत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय इतर काहीही लिहिले, पेपर फाडला तर विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते. ही नियमित प्रक्रिया आहे. १३ तारखेपर्यंत ही चौकशी चालेल. सुमारे ५०० विद्यार्थ्यांची चौकशी होईल.- व्ही. व्ही. जोशी, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद