शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

म्हणे, आज पाणी येणार नाही; आले मनपा कर्मचाऱ्यांच्या मना, तेथे कोणाचे चालेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:09 IST

सकाळी सात वाजेपर्यंत पाणी आले नाही. नागरिकांनी टाकीवर जाऊन विचारणा केली, तेव्हा एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारण विचारले, तर ते म्हणतात, माहीत नाही.

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा किमान चार दिवसाआड तरी व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करा, असे आदेश प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले होते. याचा आधार घेत पाणीपुरवठा विभागातील ‘तज्ज्ञ’ कर्मचाऱ्यांनी शहरातील अनेक भागांचा पाणीपुुरवठाच विस्कळीत करून टाकला आहे. ज्युब्ली पार्क पाण्याच्या टाकीवरील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. विशेष बाब म्हणजे, हा बदल करताना कोणालाही कल्पना दिली नाही. कर्मचाऱ्यांचा या प्रतापामुळे गुरुवारपासून तब्बल दीड लाखाहून अधिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ज्युब्ली पार्क पाण्याच्या टाकीवरून पहाटे ४.३० पासून पाणी वितरणाला सुरुवात होते. शुक्रवारी पहाटे भडकलगेट, नूर कॉलनी, टाऊन हॉल, आदी वसाहतींना पाणी देण्यात येणार होते. नागरिक पहाटेपासून पाण्याची वाट पाहत होते. सकाळी सात वाजेपर्यंत पाणी आले नाही. नागरिकांनी टाकीवर जाऊन विचारणा केली, तेव्हा एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारण विचारले, तर ते म्हणतात, माहीत नाही. वरिष्ठांनी सांगितल्यामुळे आम्ही गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली. गुरुवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणी दिले नाही. त्यांना शुक्रवारी पाणी देण्यात आले. नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, आदी वसाहतींना शुक्रवारी पाणीपुरवठा करायचा होता. आता त्यांना शनिवारी किंवा रविवारी पाणी येईल, असे सांगण्यात आले. शनिवारी (ता. ३०) फारोळा येथे अत्यावश्यक दुरुस्तीसाठी दोन तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. त्यामुळे या काळात शहराच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद राहणार आहेत. शहरातील संपूर्ण पाणी वितरणावर याचा परिणाम होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहेत. त्यात भर म्हणून शनिवारी वीज वितरण कंपनी दोन तास शटडाऊन घेणार आहे. फारोळा येथील महापालिकेच्या नवीन व जुन्या पंपगृहाला चितेगाव येथील २२० केव्ही उपक्रेंद्रातून एक्सप्रेस फिडरव्दारे वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रात रोहित्राला जोडणी करण्यात आलेल्या करंट ट्रान्स्फॉर्मरमधून (सीटी) ऑइल लिकेज होत आहे. त्यामुळे करंट व व्होल्टेजमध्ये अनियमितता येऊन मोठा बिघाड होण्याचा धोका आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी १२ ते दुपारी २ या वेळेत खंडणकाळ घेण्यात येईल, असे वीज कंपनीने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे या काळात ५६ एमएलडी व १०० या दोन्ही योजनेचा पाणी उपसा बंद राहणार आहे. परिणामी शनिवारी ज्या भागात पाणीपुरवठा असेल, तेथील वेळापत्रक कोलमडणार आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

काय म्हणाले कार्यकारी अभियंता...पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला या संदर्भात मला काहीच माहिती नाही. कनिष्ठ अभियंता अरुण मोरे यांना या संदर्भात अधिक माहिती असेल. त्यांना विचारून माहिती देतो.- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता.

कनिष्ठ अभियंता यांचे मत वेगळेचअनेक वसाहतींना आठ ते नऊ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. त्यांचा पाणीपुरवठा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नवीन वेळापत्रक ठरविण्यात आले. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे काही वसाहतींचे पाणी एक दिवस पुढे ढकलले. याची पूर्वसूचना नागरिकांना देणे आवश्यक होते; पण आमचे चुकले.- अरुण मोरे, कनिष्ठ अभियंता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी