शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:06 AM

सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदच हवी होती : पाणी, रस्ते, दिवे, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांचा अभाव; मालमत्तांना दर येईना

साहेबराव हिवराळे।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. सुविधांच्या अभावामुळे मालमत्तांचे दरही खाली आले आहेत.सातारा-देवळाई ग्रामपंचायती नगर परिषदेत विलीन झाल्या. वॉर्ड रचना, आरक्षणदेखील घोषित झाले. विकासकामासाठी १०० कोटींचा निधी येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नवीन नोटिफिकेशन जाहीर झाले अन् शहरालगतचे क्षेत्र असल्याने ते महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली.सातारा-देवळाईतील नागरिकांनी शासनदरबारी व न्यायालयातही लढाई लडविली. मात्र, सातारा-देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाला. दोन्ही वॉर्डांतून लोकप्रतिनिधी निवडून दिले. मात्र, परिसरातून मालमत्ता कर वसुलीशिवाय इतर सेवा-सुविधा देण्यावर मनपाचे लक्ष नाही.तीन वर्षांचा कालावधी उलटूनही आमदार निधीशिवाय मनपाने विकासकामावर खर्च केला नाही. त्यामुळे टोलेजंग इमारतीकडे पाहत नागरिकांना चिखलातून वाट काढीत घर गाठावे लागतेय. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज या मूलभूत सेवेसाठी सतत संघर्षाची भूमिका नागरिकांना पार पाडावी लागते. सेप्टिक टँकचे सांडपाणी रस्त्यावर, मोकळ्या प्लॉटवर तुंबल्याने रोगराईची भीती सतत आहे.वीजपुरवठा सतत खंडितशहरात असूनदेखील दररोज खेड्यातील लोडशेडिंगसारखे सातारा-देवळाईकरांंना वीज गुल होण्याचा अनुभव येतो. संपर्क करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. उन्हाळ्यात उकाडा व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागते, अशी खंत जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केली.खेड्यांतील रस्ते गुळगुळीत झाले आहेत; परंतु सातारा-देवळाईकरांना देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची प्रतीक्षा आहे. विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रदीप जाधव यांनी केली.आंदोलनाच्या पवित्र्यातसेवा-सुविधा पुरवाव्यात, अन्यथा सातारा-देवळाई संघर्ष समिती नगर परिषदेच्या मागणीसाठी आंदोलन उभारेल, असा इशारा पद्मसिंह राजपूत, राहुल सिरसाठ, सोमीनाथ शिराणे, इम्रान पटेल, आबासाहेब देशमुख, रामेश्वर पेंढारे, रणजित ढेपे, शिवाजी हिवाळे, रमेश बाहुले, नीलेश चाबूकस्वार यांनी दिला आहे.मनपापेक्षा नगर परिषद बरीयेथे ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेकडून दरवर्षी टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात होता. नगर परिषदेनेदेखील केला; परंतु मनपा मोफत टँकर देत नाही, पैसे भरूनही ते पाठवीत नाही. नाईलाजाने खाजगी टँकरवर तहान भागवावी लागते. मनपापेक्षा नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ आली आहे, असे एकनाथ काळे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीelectricityवीज