शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाई न.प. लांबणीवर

By admin | Updated: August 15, 2014 01:13 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद सातारा- देवळाई नगर परिषदेची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला होणार अशी आशा बळावली होती; परंतु ती आता आठवडाभरानंतरच होईल, असे दिसून येत आहे.

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद
सातारा- देवळाई नगर परिषदेची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला होणार अशी आशा बळावली होती; परंतु ती आता आठवडाभरानंतरच होईल, असे दिसून येत आहे. मात्र, १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत अनेक प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने ती वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतून कालच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांकडून काही त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करण्यात आली आहे. ग्रामविकास सचिवाची सही झाली असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने घोषणा होईल या आशेने मंत्रालयात तग धरून बसलेल्या शिष्टमंडळाने सांगितले. प्रत्येक जण कामाचे श्रेय घेण्याकडे धडपडत आहे. सर्वांनी एकमुखी ठरावातून नगर परिषदेची मागणी केली होती, आता तीच मंडळी विरोधात असून, कर प्रणाली वाढून जाईल व ग्रामपंचायतीने केलेले काम त्या तुलनेत बऱ्यापैकी असताना मग नगर परिषद कशासाठी, असा सवाल आहे. ग्रामसभेत विविध प्रश्नांवर जोर देण्यात येणार आहे. विरोधी पक्षांनी नगर परिषद नको, महानगरपालिका द्या अन्यथा ग्रामपंचायतच राहू द्या, अशी भूमिका घेतली आहे, तर नगर परिषद लवकर करावी, असा आग्रह सातारावासीयांसह पदाधिकारी आणि नागरिकांनी लावून धरला आहे. देवळाई ग्रामपंचायतीच्या समावेशासह सातारा- देवळाईची घोषणा केव्हा होणार अन् स्वतंत्र, बसस्थानक, पाणीपुरवठा, खेळाचे मैदान, केरकचरा सफाई, रस्ते, ड्रेनेजलाईन इत्यादी प्रश्न प्रामुख्याने सोडविले जातील. सध्या पाणीपुरवठा करणारे टँकर अधूनमधून दांडी मारताना दिसत आहेत. एका वॉर्डात असल्याचे सांगून त्या वॉर्डात टँकरच येत नसल्याने पाण्यासाठी पावसाळ्यातही रांगा आढळून येत आहेत. ग्रामपंचायतीकडे कर्मचारी संख्या अपूर्ण असून, कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याची ओरड आहे.
न.प.च्या घोषणेशिवाय माघार नाही
सर्वांगीण विकासासाठी देवळाई- सातारा नगर परिषदेसाठी २००८ पासून प्रयत्नशील असून, सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्या स्वाक्षरी व घोषणेचीच प्रतीक्षा आहे. आता माघार नाही, असे माजी सरपंच यशवंत कदम यांनी सांगितले.
कायापालट होईल
सातारा- देवळाई परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामपंचायतीचे प्रयत्न अपूर्ण ठरतात, परिसराचा कायापालट करण्यासाठी नगर परिषदेच्या घोषणेकडे लक्ष लागले आहे. शासनाने लवकरच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
-फिरोज पटेल (माजी सरपंच सातारा ग्रामपंचायत)
जनतेच्या प्रयत्नाला फळ मिळणारच आहे
४रस्ते, पाणी, ड्रेनेज इत्यादी प्रश्न ऐरणीवर असल्याने जनतेला सेवा- सुविधा पुरविण्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने नगर परिषदच गरजेची असून, त्यासाठी आता जोरात प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला असला तरी आठवड्यात प्रश्न मार्गी लागणार आहे, असा विश्वास सरपंच करीम पटेल (देवळाई ग्रामपंचायत) व सातारा सरपंच अलका शिरसाट यांनी व्यक्त केला.