शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

सातारा-देवळाई परिसर चार वर्षांनंतरही विकासापासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 6:19 PM

महानगरपालिकेत समाविष्ट होऊन पाच वर्षांकडे वाटचाल होत असलेल्या सातारा-देवळाई परिसरात काहीही बदल झालेला नाही. ग्रामपंचायतीच्या साधनावरच मनपाची मदार आहे. 

ठळक मुद्दे रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिनीसाठी महापालिकेकडून आश्वासनांची खैरात

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : सातारा-देवळाई चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट होऊनदेखील मनपा प्रशासन कोणत्याही ठोस भूमिकेवर नसल्याने या भागातील रहिवाशांची फरपट सुरू आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी मनपाकडे पाठपुरावा केला. आंदोलन केले; परंतु त्यांच्या आंदोलनाला चिरडण्यात आले. दरवेळी केवळ आश्वासनांची बोळवण केली जात आहे. प्रत्यक्षात सुविधा पुरविण्यात येत नाहीत. ‘साताऱ्याची तऱ्हा’ या मालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात दडलेल्या प्रश्नांना ‘लोकमत’मधून वाचा फोडण्याचा हा प्रयत्न.

सातारा-देवळाई या दोन्ही गावांतील परिसरातील वाढत्या लोकसंख्येनुसार सेवा-सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायती अपुऱ्या ठरत असल्याने सातारा-देवळाई ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून नगर परिषद स्थापन करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बदल होईल असा आशावाद निर्माण झाला होता. २५ वॉर्डांची रचना  करून निवडणुकीच्या तयारीला लागलेली नगर परिषद राजकीय हेतूपोटी रद्द करून मनपात समाविष्ट करण्यात आली. त्यावेळी नागरिकांनी विरोध दर्शविला; परंतु त्याचा फायदा झाला नाही. नगर परिषदेकडूनही तुम्हाला सेवा-सुविधा पुरविल्या जाऊ शकत नाहीत. मनपाच्या कार्यक्षेत्रालगत असल्याने विकासासाठी सोयीचे ठरणार आहे, असे नागरिकांना राजकीय नेत्यांनी सांगितले. २५ वॉर्डांचे फक्त दोनच वॉर्ड तयार झाले आणि निवडणुका पार पडल्या; परंतु आतापर्यंत एकाही प्रश्नाची सोडवणूक मनपाने केलेली नाही.

शिष्टमंडळाला आश्वासनांची खैरातगत चार वर्षांपासून सतत भांडणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण मनपा आयुक्त व महापौर यांच्याकडून झालेले नाही. ग्रामपंचायतीच्या काळातील यंत्रणेवरच सर्व काही आजही सुरू आहे. आठवड्यात नागरिकांचे एक शिष्टमंडळ निवेदन घेऊन जाते आणि फक्त आश्वासनांची खैरात घेऊन येते. प्रत्यक्षात काम करण्यावर ठेकेदार अथवा प्रतिनिधीदेखील लक्ष देत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे.  पाच वर्षांत खासदार व आमदार निधी या भागातच खर्च झाला नसल्याने एकही नवीन काम झाले नाही. ग्रामपंचायतीच्या काळात मोफत टँकरचे पाणी नागरिकांना मिळत होते. मनपात आल्यावर त्या टँकरच्या पाण्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे नागरिकांत मनपाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पैठण रोड महानुभव आश्रम ते देवळाईपर्यंत एकाही कॉलनीचा कायापालट करण्यावर लक्ष देण्यात आलेले नाही. खेड्यातून शहरात आल्यावर बदल होईल, असे स्वप्न नागरिकांनी बाळगले होते. चार वर्षांनंतरही त्याची पूर्तता झालेली दिसत नाही. किरकोळ प्रश्नांसाठी जनआंदोलनाशिवाय जनतेला दुसरा पर्याय राहिलेला नाही. अजून किती दिवस विकासापासून कोसोदूर ठेवणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

रेंगाळलेले प्रश्न- पाऊणलाखाच्या वर लोकसंख्या- चार वर्षांत ठोस कामाची पूर्तता नाही- रस्त्यांची कामे मंजूर; पण कासवगतीने सुरू- टोलेजंग घरे बांधली; परंतु सेवा-सुविधांपासून कोसोदूर- पाण्यासाठी आजही नागरिकांची भटकंती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी