शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संत शक्ती मैदानात उतरली अन् विरोधकांचा सुपडासाफ झाला: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:42 IST

'पुन्हा येतो म्हणलो की मी पुन्हा येतोच'

वैजापूर : लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार करून प्रचार केला. त्यामुळे त्यांचे वोट जिहादचे आक्रमण हे हिंदू संस्कृतीवर आक्रमण आहे, हे जेव्हा आम्ही रामगिरीजी महाराज व संत शक्तीच्या लक्षात आणून दिले, तेव्हा सर्व संत शक्ती मैदानात उतरली. त्यामुळे विरोधकांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शनि देवगाव येथे आयोजित कार्यक्रमात केले.

सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महंत रामगिरी महाराज, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. रमेश बोरनारे, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रयोग झाला. या प्रयोगातून एकप्रकारे व्होट जिहाद ही व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्यासाठी एकत्र आली. ज्यावेळी हे षडयंत्र लक्षात आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि सर्व संत शक्ती, आध्यात्मिक शक्ती मैदानात उतरली. त्यामुळे विरोधकांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुन्हा येतो म्हणलो की मी पुन्हा येतोचमहंत रामगिरीजी महाराज यांच्या सारख्या साधू संतांनी आमचे सरकार तारले आहे. त्यांच्या आशीर्वादाने या सरकारचे काम चालू आहे. या सप्ताहातील अथांग महासागराप्रमाणे येथील भाविकांचा महासागर पाहून मी भारावून गेलो आहे. मी पुढच्या वर्षी या सप्ताहाला पुन्हा येणार आहे. आणि मी पुन्हा येतो, म्हणलो की पुन्हा येतोच, हा इतिहास आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस