शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 17:45 IST

आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही डावलल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी

ठळक मुद्देआयारामांची शिवसेना निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर 

औरंगाबाद : मंत्रिमंडळात समावेश न झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी लक्षात घेत समजूत काढली असली तरी हाताशी आलेली संधी हुकल्यामुळे शिरसाट अस्वस्थ आहेत. आता आ. शिरसाट यांची अस्वस्थता पक्ष कशी दूर करणार, हे येणाऱ्या काळात कळेल. 

हॅट्ट्रीक करूनही संजय शिरसाट यांचा पत्ता का कट झाला?

आ. शिरसाट यांना एखादे महत्त्वाचे महामंडळ मिळते की भविष्यात पुन्हा होणाऱ्या विस्तारापर्यंत वाट पाहावी लागते, हे कळण्यास मार्ग नाही. राज्य  मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या विस्तारात जिल्ह्यात दोन मंत्रिपदे मिळाली आहेत, मात्र शहरात एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.  मंत्रिमंडळात वर्णी लागणार या खात्रीमुळे आ. शिरसाट यांनी समर्थक व नातेवाईकांना मुंबईला नेण्याची तयारी करून ठेवली होती; परंतु आ. अब्दुल सत्तार यांच्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे समर्थकांकडून ऐकण्यास मिळाले. आ. सत्तार यांना मंत्रिपद देण्याबाबत पक्षातील सर्वांचा एकमताने विरोध होता; परंतु मुख्यमंत्र्यांनी आ. सत्तार यांनी मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचा शब्द दिला होता, त्यावर सत्तार अडून बसल्याने शेवटी नाईलाजास्तव आ. शिरसाट यांचे नाव डावलण्यात आले. 

दरम्यान, मंगळवारच्या भेटीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आ. शिरसाट यांच्या भावना समजून घेतल्या, शिवाय चिंता करू नका, काय द्यायचे ते मी निश्चित देईल. सध्या विस्तारात काही अडचणी होत्या, त्या समजून घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी आ. शिरसाट यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. येणाऱ्या काळात निश्चितपणे काहीतरी चांगलेच करील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांना दिला असल्याची माहिती आहे. 

निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आ. संदीपान भुमरे यांना मंत्रीपद मिळाले, याचा शिवसैनिकांना आनंद  झाला आहे; परंतु सत्तार यांनी संधी मिळाल्यामुळे जुन्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आ. शिरसाट, आ. जैस्वाल किंवा आ. अंबादास दानवे यांच्यापैकी एकाला जरी संधी मिळाली असती तर चालले असते, अशी चर्चा सुरू आहे. आ. जैस्वाल यांनीदेखील शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. २००९ ते २०१२ पर्यंतचा काळ सोडला, तर आ. जैस्वाल यांनी शिवसेनेची साथ सोडलेली नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. आयारामांना जर पदे मिळणार असतील तर निष्ठावानांनी काय करायचे, असा प्रश्न समर्थक उपस्थित करीत आहेत. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार