शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 17:45 IST

आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही डावलल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी

ठळक मुद्देआयारामांची शिवसेना निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर 

औरंगाबाद : मंत्रिमंडळात समावेश न झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी लक्षात घेत समजूत काढली असली तरी हाताशी आलेली संधी हुकल्यामुळे शिरसाट अस्वस्थ आहेत. आता आ. शिरसाट यांची अस्वस्थता पक्ष कशी दूर करणार, हे येणाऱ्या काळात कळेल. 

हॅट्ट्रीक करूनही संजय शिरसाट यांचा पत्ता का कट झाला?

आ. शिरसाट यांना एखादे महत्त्वाचे महामंडळ मिळते की भविष्यात पुन्हा होणाऱ्या विस्तारापर्यंत वाट पाहावी लागते, हे कळण्यास मार्ग नाही. राज्य  मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या विस्तारात जिल्ह्यात दोन मंत्रिपदे मिळाली आहेत, मात्र शहरात एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.  मंत्रिमंडळात वर्णी लागणार या खात्रीमुळे आ. शिरसाट यांनी समर्थक व नातेवाईकांना मुंबईला नेण्याची तयारी करून ठेवली होती; परंतु आ. अब्दुल सत्तार यांच्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे समर्थकांकडून ऐकण्यास मिळाले. आ. सत्तार यांना मंत्रिपद देण्याबाबत पक्षातील सर्वांचा एकमताने विरोध होता; परंतु मुख्यमंत्र्यांनी आ. सत्तार यांनी मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचा शब्द दिला होता, त्यावर सत्तार अडून बसल्याने शेवटी नाईलाजास्तव आ. शिरसाट यांचे नाव डावलण्यात आले. 

दरम्यान, मंगळवारच्या भेटीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आ. शिरसाट यांच्या भावना समजून घेतल्या, शिवाय चिंता करू नका, काय द्यायचे ते मी निश्चित देईल. सध्या विस्तारात काही अडचणी होत्या, त्या समजून घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी आ. शिरसाट यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. येणाऱ्या काळात निश्चितपणे काहीतरी चांगलेच करील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांना दिला असल्याची माहिती आहे. 

निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आ. संदीपान भुमरे यांना मंत्रीपद मिळाले, याचा शिवसैनिकांना आनंद  झाला आहे; परंतु सत्तार यांनी संधी मिळाल्यामुळे जुन्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आ. शिरसाट, आ. जैस्वाल किंवा आ. अंबादास दानवे यांच्यापैकी एकाला जरी संधी मिळाली असती तर चालले असते, अशी चर्चा सुरू आहे. आ. जैस्वाल यांनीदेखील शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. २००९ ते २०१२ पर्यंतचा काळ सोडला, तर आ. जैस्वाल यांनी शिवसेनेची साथ सोडलेली नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. आयारामांना जर पदे मिळणार असतील तर निष्ठावानांनी काय करायचे, असा प्रश्न समर्थक उपस्थित करीत आहेत. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार