शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘तिच्या’ मृत्यूच्या सावटाखाली सानेगुरुजी आश्रमशाळा

By admin | Updated: March 27, 2015 00:42 IST

लातूर : लातूर तालुक्यातील काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेवर ‘तिच्या’ मृत्यूचे सावट आहे. या शाळेतील दोन शिक्षकांवर बलात्कारानंतर खुनाचा गुन्हा दाखल होताच

 

लातूर : लातूर तालुक्यातील काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेवर ‘तिच्या’ मृत्यूचे सावट आहे. या शाळेतील दोन शिक्षकांवर बलात्कारानंतर खुनाचा गुन्हा दाखल होताच आश्रमशाळेला शासकीय अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी भेटी देण्याच्या घटना अचानक वाढल्या. गुरुवारी शाळेवर सकाळपासून तब्बल आठ पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता. तर समाजकल्याणसह विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीने आश्रमशाळा दिवसभर व्यस्त राहिली. बुधवारी सकाळी काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेच्या एका मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचा मृत्यू बलात्कारानंतर झाल्याचा आरोप करून फेर शवविच्छेदनाची मागणी केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. अखेर दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला. गुरुवारी सानेगुरुजी आश्रमशाळेवर दिवसभर विविध मान्यवरांची रिघ लागली होती. प्रादेशिक समाजकल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय दाणे यांनी सायंकाळी स्वत: शाळेवर जाऊन भेट दिली. मुलांशी चर्चा केली. याशिवाय, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने आश्रमशाळेवर दिवसभर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये पीएसआय घोडके, पीएसआय दामटे, हेकॉ. राख, भोसले, थडकर व कुरे आणि सोनवणे अशा सात पोलिसांचा फौजफाटा दिवसभर आश्रमशाळेवर होता. त्यामुळे शाळेला जवळ जवळ छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी) काटगावमधील या सानेगुरुजी आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापकासह एकूण ९ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. मुख्याध्यापक एस.डी. चव्हाण हेच संस्थापक आहेत. काटगाव गावानजीक असलेल्या पेट्रोलपंपाच्या पुढे आश्रमशाळेची भव्य इमारत असून, ‘डब्ल्यू’ आकारात बांधल्या जात असलेल्या या आश्रमशाळेचे अद्ययावत दोन मजले तयार आहेत. तर तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे साहित्य आवारात पडले आहे. आश्रमशाळेच्या इमारतीतच दोन खोल्या मुलांसाठी, तर दोन खोल्या मुलींसाठी राखीव असून, तिथेच मुले-मुली राहतात. ४भोजन करण्यासाठी मुलांना रस्ता ओलांडून पलिकडे भोजन कक्षात जावे लागते. तिथे वसतिगृह अधीक्षकाचे निवासस्थान आहे. ते कुटुंबासह तिथेच राहतात. दररोज रात्री १० पर्यंत शिकवणी वर्ग होतात.