शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

समान पाणीटंचाई धोरणात लातूर जिल्ह्याला टँकर कमीच !

By admin | Updated: September 3, 2015 00:29 IST

लातूर/औसा : प्रत्येक जिल्ह्यात समान पाणीटंचाईचा निकष लावला असल्याचा दावा शासन करीत असले तरी बीडला ७०० टँकर, उस्मानाबादला ५०० टँकर मंजूर केले आहेत.

लातूर/औसा : प्रत्येक जिल्ह्यात समान पाणीटंचाईचा निकष लावला असल्याचा दावा शासन करीत असले तरी बीडला ७०० टँकर, उस्मानाबादला ५०० टँकर मंजूर केले आहेत. मात्र २४ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ ११२ टँकर आहेत़ समान टंचाई धोरणात लातूरवर अन्याय का, असा प्रश्न लोकप्रतिनिधींसह नागरिक उपस्थित करीत आहेत़ मुख्यमंत्र्यांसमोरही लातूरकरांनी नाराजी व्यक्त करुन टँकर वाढविण्याची मागणी केली आहे़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे भीषण टंचाईचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे़ त्यामुळे टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु, टँकर मंजुरीच्या प्रस्तावाला तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळत नाही़ सध्या जिल्ह्यात एकूण ५० गावांनी टँकरसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत़ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे हे प्रस्ताव जातात़ प्रस्ताव आलेल्या गावांची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाते़ मागणी झालेल्या गावाच्या परिसरात किमान दीड किलोमीटर अंतरावर पाण्याचा स्त्रोत नसेल तर त्या गावच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते़ पाण्याचा स्त्रोत दीड कि़मी़ अंतरावर असेल तर टँकरला मंजुरी दिली जात नाही़ या अटीनुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा अहवाल तहसीलदारांकडे जातो़ त्यानंतर तहसीलदार टँकरला परवानगी देतात़ हे प्रशासकीय नियम आहेत़ या नियमानुसारच सध्या टँकरला मंजुरी दिली जात आहे़ त्यामुळे लातूर जिल्ह्यात टँकरची संख्या कमी आहे़ शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यात ५०० टँकर तर बीड जिल्ह्यात ७०० टँकर आहेत़ आपल्याकडे मात्र ११२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ महानगरपालिकेने स्वत:च्या अधिकारात ४६ टँकर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लावले आहेत़ (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात ९४२ अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ अधिग्रहण केलेल्या स्त्रोतांमध्ये पाणी आहे़ हे स्त्रोत गावांच्या दीड किलोमीटर अंतराच्या आत आहेत़ त्यामुळे टँकरची संख्या कमी आहे़ अधिग्रहणावर भागत नसेल तर टँकर हा पर्याय आहे़ सध्या अधिग्रहण केलेल्या ९४२ स्त्रोतातून पाणी मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़ कमी खर्च करुन दुष्काळाच्या परिस्थितीचे निवारण केले आणि शासनाचा खर्च वाचविला अशी पाठ थोपटून घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी टँकरला मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणे केली़ लातूर, बीडची दुष्काळी परिस्थिती सारखीच आहे़ परंतु, बीडला एक आणि लातूरला एक असा न्याय का असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला़ परंतु, मुख्यमंत्र्यांनी यावर काही भाष्य केले नाही़ परिणामी, दुजाभाव होत असल्याची भावना लातूरकरांची झाली आहे़ जिल्ह्यातील दहाही तालुक्यातून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत़ मात्र या प्रस्तावाच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी होत नसल्याने ते प्रलंबित आहेत़ तहसीलदारांपर्यंत क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा अहवाल आला नसल्यामुळे संबंधीत गावांना टँकरची प्रतीक्षा आहे़