शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू दालनात प्रचंड राडा, अभ्यास मंडळाच्या सदस्य नेमणुकीवरून दोन गट भिडले; शिवीगाळसह हामरीतुमरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 21:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात शनिवारी सायंकाळी प्रचंड राडा झाला. अभ्यास मंडळाच्या मध्यरात्री केलेल्या नेमणुकींवरून दोन्ही गट अपसात भिडले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात शनिवारी सायंकाळी प्रचंड राडा झाला. अभ्यास मंडळाच्या मध्यरात्री केलेल्या नेमणुकींवरून दोन्ही गट अपसात भिडले. एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ, आरडाओरडीने हे कुलगुरू दालन आहे की, राजकीय अड्डा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मागील काही महिन्यांपासून कुलगुरू दालनात गोंधळाचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यानंतर अभ्यास मंडळाच्या निवडणुका काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. या अभ्यास मंडळांवर एकूण ९ पैकी ६ जणांच्या नेमणुका होतात. तर उर्वरित ३ जण निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात. एकू ण ३१ अभ्यास मंडळांवर प्रत्येकी सहा सदस्यांच्या नेमणुका प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता न पाहताच केल्या असल्याचा आक्षेप घेत उत्कर्ष पॅनलच्या नवनिर्वाचित अधिसभा सदस्यांनी घेतला होता. तसेच चुकीच्या पद्धतीने होणाºया नेमणुका थांबविण्यासाठी सर्व सदस्य कुलगुरू दालनात दुपारपासून कुलगुरूंची वाट पाहत होते. कुलगुरू साडेतीन वाजेदरम्यान दालनात आले. तेव्हा उत्कर्ष पॅनलचे प्रतिनिधी आतमध्ये होते. कुलगुरूंशी त्यांचा संवाद सुरू असतानाच विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाºयांनी या लोकांना किती वेळ देणार? असा सवाल उपस्थित केला. यावरून दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह शिवीगाळ करण्यापर्यंत दोन्ही गटाच्या सदस्यांची मजल गेली. हा सर्व प्रकार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हताशपणे पाहत होते. हातघाईवरची परिस्थिती मारामारीवर येण्याची शक्यता असतानाच सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. हा सर्व प्रकार पाहून गोंधळ घालणारे हे प्राध्यापक असू शकतात? असा सवाल उपस्थित झाला आहे.

आधी त्यांनी करून घेतले आता दुस-या गटानेविद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे म्हणाल्या, चार अधिसभा सदस्यांची नेमणूक करून घेतली. तेव्हा उत्कर्ष गटाने नियमांची मागणी केली नाही. मात्र आता नियमांची, बायोडाटा मागवून नेमणुका करण्याची मागणी करीत आहेत. एका वेळी दुसरी आणि आता वेगळीच भूमिका घेतात. या दोन्ही नेमणुकांमध्ये कुलगुरूंना अधिकार आहेत. विद्यापीठ कायद्याचा कोठेही भंग केलेला नाही. ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी राज्यपाल, न्यायालयाकडे खुशाल जावे. आम्हाला काहीही देणे-घेणे नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

एकाच कॉलेजच्या अकरा जणांच्या नियुक्त्याअभ्यास मंडळांवर एकाच महाविद्यालयातील अकरा जणांच्या नेमणुका केल्या आहेत. यातील अनेक जण पात्रसुद्धा नाहीत. राज्यातील इतर सर्व विद्यापीठांनी नेमणुकांसाठी अर्ज मागविले आहेत. याच विद्यापीठात रात्रीच्या अंधारातून सर्वांना मेलवर पत्रे पाठविली जातात. काही लोक गुंडागर्दी करून यादी घेऊन येतात आणि तीच यादी मान्य केली जाते. हे चुकीचे असल्याचे अधिसभा सदस्य डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

एका गटाचा आक्षेप तर दुस-याचा विरोधच्कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अभ्यास मंडळावर नियुक्त केलेल्या  सदस्यांमध्ये अनेकांनी शैक्षणिक पात्रताच पूर्ण केलेली नाही. एकाच महाविद्यालयातील १० ते ११ जणांना संधी देण्यात आलेली आहे. ही सर्व महाविद्यालये संघ आणि भाजपच्या विचारसरणीची असल्याचा आरोप उत्कर्षच्या सदस्यांनी केला. तर विद्यापीठ विकास मंचने कुलगुरूंच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाली असल्याचे मंचच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

हा दुर्दैवी प्रकार या सर्व गोंधळाविषयी बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी हा दुर्दैवी प्रकार असल्याचे सांगितले. प्राध्यापकांना कसे वागावे याचे भान असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच अधिसभा आणि अभ्यास मंडळावर केलेल्या नेमणुका अधिष्ठाता, कुलसचिव यांच्याशी चर्चा करूनच केल्या असल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.

पोलिसात तक्रारकुलगुरूंच्या दालनात विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणावर नवनिर्वाचित अधिसभा सदस्य चर्चा करत असताना विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाºयांनी आत घुसखोरी करत काही अधिसभा सदस्यांना धमकावले असल्याची तक्रार उत्कर्ष पॅनलतर्फे बेगमपूरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आम्हीही गुंडागर्दी करू शकतोकुलगुरूंच्या दालनात शाळेतील शिक्षक येऊन शिवीगाळ करतो. कुलगुरू दालनाच्या सर्व मर्यादा ओलांडतो. हे निषेधार्ह आहे. जर त्यांना वाटत असेल की कुलगुरूंच्या दालनात येऊन गोंधळ घालून नेमणुका थांबवता येतात. तर आम्हीही ठोशास ठोसा देऊ शकतो. गुंडागर्दी करू शकतो. हे लक्षात ठेवावे, असे विद्यापीठ विकास मंचचे डॉ. शंकर अंभोरे यांनी कुलगुरू दालनात गोंधळानंतर बोलताना स्पष्ट केले.