शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू दालनात प्रचंड राडा, अभ्यास मंडळाच्या सदस्य नेमणुकीवरून दोन गट भिडले; शिवीगाळसह हामरीतुमरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 21:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात शनिवारी सायंकाळी प्रचंड राडा झाला. अभ्यास मंडळाच्या मध्यरात्री केलेल्या नेमणुकींवरून दोन्ही गट अपसात भिडले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात शनिवारी सायंकाळी प्रचंड राडा झाला. अभ्यास मंडळाच्या मध्यरात्री केलेल्या नेमणुकींवरून दोन्ही गट अपसात भिडले. एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ, आरडाओरडीने हे कुलगुरू दालन आहे की, राजकीय अड्डा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मागील काही महिन्यांपासून कुलगुरू दालनात गोंधळाचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यानंतर अभ्यास मंडळाच्या निवडणुका काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. या अभ्यास मंडळांवर एकूण ९ पैकी ६ जणांच्या नेमणुका होतात. तर उर्वरित ३ जण निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात. एकू ण ३१ अभ्यास मंडळांवर प्रत्येकी सहा सदस्यांच्या नेमणुका प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता न पाहताच केल्या असल्याचा आक्षेप घेत उत्कर्ष पॅनलच्या नवनिर्वाचित अधिसभा सदस्यांनी घेतला होता. तसेच चुकीच्या पद्धतीने होणाºया नेमणुका थांबविण्यासाठी सर्व सदस्य कुलगुरू दालनात दुपारपासून कुलगुरूंची वाट पाहत होते. कुलगुरू साडेतीन वाजेदरम्यान दालनात आले. तेव्हा उत्कर्ष पॅनलचे प्रतिनिधी आतमध्ये होते. कुलगुरूंशी त्यांचा संवाद सुरू असतानाच विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाºयांनी या लोकांना किती वेळ देणार? असा सवाल उपस्थित केला. यावरून दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह शिवीगाळ करण्यापर्यंत दोन्ही गटाच्या सदस्यांची मजल गेली. हा सर्व प्रकार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हताशपणे पाहत होते. हातघाईवरची परिस्थिती मारामारीवर येण्याची शक्यता असतानाच सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. हा सर्व प्रकार पाहून गोंधळ घालणारे हे प्राध्यापक असू शकतात? असा सवाल उपस्थित झाला आहे.

आधी त्यांनी करून घेतले आता दुस-या गटानेविद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे म्हणाल्या, चार अधिसभा सदस्यांची नेमणूक करून घेतली. तेव्हा उत्कर्ष गटाने नियमांची मागणी केली नाही. मात्र आता नियमांची, बायोडाटा मागवून नेमणुका करण्याची मागणी करीत आहेत. एका वेळी दुसरी आणि आता वेगळीच भूमिका घेतात. या दोन्ही नेमणुकांमध्ये कुलगुरूंना अधिकार आहेत. विद्यापीठ कायद्याचा कोठेही भंग केलेला नाही. ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी राज्यपाल, न्यायालयाकडे खुशाल जावे. आम्हाला काहीही देणे-घेणे नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

एकाच कॉलेजच्या अकरा जणांच्या नियुक्त्याअभ्यास मंडळांवर एकाच महाविद्यालयातील अकरा जणांच्या नेमणुका केल्या आहेत. यातील अनेक जण पात्रसुद्धा नाहीत. राज्यातील इतर सर्व विद्यापीठांनी नेमणुकांसाठी अर्ज मागविले आहेत. याच विद्यापीठात रात्रीच्या अंधारातून सर्वांना मेलवर पत्रे पाठविली जातात. काही लोक गुंडागर्दी करून यादी घेऊन येतात आणि तीच यादी मान्य केली जाते. हे चुकीचे असल्याचे अधिसभा सदस्य डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

एका गटाचा आक्षेप तर दुस-याचा विरोधच्कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अभ्यास मंडळावर नियुक्त केलेल्या  सदस्यांमध्ये अनेकांनी शैक्षणिक पात्रताच पूर्ण केलेली नाही. एकाच महाविद्यालयातील १० ते ११ जणांना संधी देण्यात आलेली आहे. ही सर्व महाविद्यालये संघ आणि भाजपच्या विचारसरणीची असल्याचा आरोप उत्कर्षच्या सदस्यांनी केला. तर विद्यापीठ विकास मंचने कुलगुरूंच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाली असल्याचे मंचच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

हा दुर्दैवी प्रकार या सर्व गोंधळाविषयी बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी हा दुर्दैवी प्रकार असल्याचे सांगितले. प्राध्यापकांना कसे वागावे याचे भान असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच अधिसभा आणि अभ्यास मंडळावर केलेल्या नेमणुका अधिष्ठाता, कुलसचिव यांच्याशी चर्चा करूनच केल्या असल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.

पोलिसात तक्रारकुलगुरूंच्या दालनात विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणावर नवनिर्वाचित अधिसभा सदस्य चर्चा करत असताना विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाºयांनी आत घुसखोरी करत काही अधिसभा सदस्यांना धमकावले असल्याची तक्रार उत्कर्ष पॅनलतर्फे बेगमपूरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आम्हीही गुंडागर्दी करू शकतोकुलगुरूंच्या दालनात शाळेतील शिक्षक येऊन शिवीगाळ करतो. कुलगुरू दालनाच्या सर्व मर्यादा ओलांडतो. हे निषेधार्ह आहे. जर त्यांना वाटत असेल की कुलगुरूंच्या दालनात येऊन गोंधळ घालून नेमणुका थांबवता येतात. तर आम्हीही ठोशास ठोसा देऊ शकतो. गुंडागर्दी करू शकतो. हे लक्षात ठेवावे, असे विद्यापीठ विकास मंचचे डॉ. शंकर अंभोरे यांनी कुलगुरू दालनात गोंधळानंतर बोलताना स्पष्ट केले.