शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे नाचले कागदी घोडे ! मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेवर २३५० कोटींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 16:58 IST

मराठवाड्यातील दुष्काळ काही संपला नाही 

ठळक मुद्देग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण कायम २०१५-१८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे पूर्ण करण्यात आली.

- विकास राऊत औरंगाबाद : जलयुक्त शिवार अभियान या योजनेवर सुमारे २ हजार ३५० कोटी खर्च होऊनही मराठवाड्यातील दुष्काळ काही संपला नाही. ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण जूनअखेरीसही सुरू असल्यामुळे कोट्यवधींचा खर्च मुरला कुठे असा प्रश्न आहे. लोक सहभागातून अंदाजे ३५० आणि शासकीय अनुदानातून सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या खर्चातून ८.१९ लक्ष टीसीएम पाणी मराठवाड्यातील ३५०० गावांत साठल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मागील साडेतीन वर्षांतील ही आकडेवारी आहे.  

बीड जिल्ह्यातील १५ गावांमध्ये शंभर टक्के  कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. औरंगाबाद विभागात २०१५-१६ या वर्षात १६८२, २०१६-१७ मध्ये १५१८, २०१७-१८ मध्ये १२४८, तर वर्ष २०१८-१९ मध्ये १५६९, अशी एकूण ६०२३ गावांची निवड करण्यात आली. गेल्या वर्षी निवडलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे काम अजूनही सुरू आहे. प्रकल्प आराखड्यात निवडलेल्या विभागातील १५६९ पैकी ९४२ गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३०४, जालना २०६, बीड ७१, परभणी १३, नांदेड १२१, लातूर १४९ तर उस्मानाबाद जिल्ह्यांतील ७८ गावांचा समावेश आहे.

२०१५-१८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे पूर्ण करण्यात आली. मराठवाड्यातील ३५०० गावे जलयुक्त करण्यात झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडादुष्काळाच्या उंबरठ्यावर का, याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसले आहे. साचलेल्या पाण्याचे मोजमाप आणि जमिनीत मुरलेल्या पाण्याची आकडेमोड प्रशासनाने कशाच्या आधारे केली, याची माहिती पुढे येत नाही. जून संपत आला तरी मराठवाड्यातील सर्वच मंडळांत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. तीन वर्षांतील जलयुक्त शिवार योजनेतील पाणी आणि पैसा कुठे मुरला यावर संशोधन अपेक्षित आहे.

१३ योजनांच्या एकत्रीकरणातून अभियान५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र- २०१९’ या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान ही योजना पुढे आली. १३ शासकीय योजनांचे एकात्मीकरण असलेल्या या योजनेत कामे आहेत. साखळी बंधाऱ्यांसह नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाणलोट विकास, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) कामांची दुरुस्ती, नूतनीकरण व पुनर्स्थापना, नव्या-जुन्या सर्व प्रकारच्या छोट्या तलावांतून गाळ काढणे, मध्यम व मोठा प्रकल्पांची सिंचन क्षमता प्रत्यक्ष वापरात येण्याकरिता उपाययोजना करणे, छोटे नाले, ओढे, जोड प्रकल्प, विहीर व बोअरवेल यांचे पुनरुज्जीवन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण आणि कालवा दुरुस्ती ही कामे एकात्मिक पद्धतीने होणे अपेक्षित होते. ही कामे खरंच या पद्धतीने झाली का? असा प्रश्न आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारState Governmentराज्य सरकारfundsनिधीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ