शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
3
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
4
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
5
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
6
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
7
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
8
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
9
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
10
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
11
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
12
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
13
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
14
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
15
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
16
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
17
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
18
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
19
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
20
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
Daily Top 2Weekly Top 5

आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 22, 2025 19:30 IST

सावधान! तुम्ही जास्त किंवा कमी टीडीएसचे पाणी पीत नाही ना !

छत्रपती संभाजीनगर : ‘शुद्ध पाणी म्हणजे आरोग्यदायीपाणी" असा समज बळावत चालला आहे. अतिशुद्ध पाणीच आरोग्य बिघडवत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. आपल्या शुद्ध पाण्याविषयीच्या समजाला हे धक्का देणारं आहे. आरओ फिल्टरमधून मिळणाऱ्या अगदी कमी टीडीएस असलेल्या पाण्यामुळे शरीराला आवश्यक खनिजांचं प्रमाण कमी होऊ शकतं. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेलं पाणी दोन्ही अपायकारक असू शकतं. त्यामुळे सावधान! ‘शुद्धते’च्या अतिरेकाने आपलं आरोग्य धोक्यात तर येत नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

लोकमतने शनिवारी शहरातील सिडकोतील जलकुंभ, छावणी-टिळकनगरातील आरो केंद्र, मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील हॉटेल, क्रांती चौकातील दुकान, पुंडलिनगरातील नळाचे पाणी व बीड बायपास येथील बोर, विहिरीचे व आरोच्या पाण्याची ‘टीडीएस’ चाचणी केली. यात अवघ्या ३० ते ४३० मि.ग्रॅ/लि. पर्यंतचे टीडीएस आढळून आले. आरो जार केंद्रात ३० ते ६० मि.ग्रॅ/लि. दरम्यान टीडीएसचे प्रमाण आढळून आले. मनपाच्या जलकुंभातील पाण्यात ३५० टीडीएस आढळून आले. याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी आरोग्यासाठी हितकारक नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मूत्ररोग तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर काय म्हणाले...१) पाण्यातील टीडीएस (टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स) म्हणजे पाण्यात विरघळलेले घनद्रव्य होय.२) पिण्याच्या पाण्यात आदर्श टीडीएसचे प्रमाण ५० ते १५० मि.ग्रॅ/लि. असले पाहिजे.३) ५० पेक्षा कमी टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला फिकट व नीरस लागते.४) १५० पेक्षा जास्त टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला कडवट लागते.५) पाण्यात कमी टीडीएस असेल तर कॅल्शियम, सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम वेगवेगळ्या खनिजांची मात्रा, शरीरात कमी होऊ शकते.६) कमी टीडीएसचे पाणी पिल्यास हाडे ठिसूळ होतात. सांध्यामध्ये त्रास होऊ शकतो. उदा. सोडियम कमी झाले तर चक्कर येऊ शकते.७) जास्त टीडीएसचे पाणी पिले तर खनिजांचे रक्तातील प्रमाण वाढू शकते. उदा. पोटॅशियम वाढले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.८) जागतिक आरोग्य संघटनेनुसार ३०० मि.ग्रॅ./लि. पेक्षा कमी टीडीएस असल्यास ते पाणी पिण्यायोग्य समजले जाते.९) पाण्याचे टीडीएस जास्त असल्यास पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. तसेच किडनीचे आजार होऊ शकतात.१०) जास्त टीडीएसचे पाणी पिणाऱ्यांमध्ये मुतखड्याचे आजार जास्त दिसून येतात.

पिण्याच्या पाण्यात आढळणारे रासायनिक व जैविक घटक व त्यांचे शरीरावर होणारे परिणामस्त्रोत : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील पाणी तपासणी प्रयोगशाळेतून मिळालेली माहिती.घटक (द्रव्य) - अतिरिक्त असल्यास शरीरावर होणारे परिणाम१) विरघळलेले क्षार (टीडीएस)- हृदयाशी संबंधित आजार, रक्तवाहिन्यांचे विकार, कर्करोगाचे आजार, पचनसंस्थेतील बिघाड.२) कठीणपणा - त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचारोग, मुतखडा३) अल्कलायनिटी - उलटी, अस्वस्थता४) क्लोराइड- पाण्यात खारटपणा जाणवतो.५) कॅल्शियम--- त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचा रोग, मुतखडा६) फ्लोराइड---हाडांचा ठिसूळपणा, उच्च रक्तदाब, दंतक्षय, दातांचा पिवळेपणा.७) लोह-- मधुमेह, पोटाचे विकार, फफ्फुस, पचनग्रंथी, हृदयाचे विकार.८) नायट्रेट- ब्लू बेबी सिंड्रोम.९) सल्फेट- हगवण लागणे.१०) कोलीफॉर्म--- उलट्या, मळमळ, गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ......................................... 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीHealthआरोग्य