शहरं
Join us  
Trending Stories
1
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
2
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
3
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
4
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
5
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
6
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
7
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
8
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
9
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
10
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
11
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
12
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
13
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
14
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
15
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
16
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
17
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
18
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
19
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
20
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 22, 2025 19:30 IST

सावधान! तुम्ही जास्त किंवा कमी टीडीएसचे पाणी पीत नाही ना !

छत्रपती संभाजीनगर : ‘शुद्ध पाणी म्हणजे आरोग्यदायीपाणी" असा समज बळावत चालला आहे. अतिशुद्ध पाणीच आरोग्य बिघडवत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. आपल्या शुद्ध पाण्याविषयीच्या समजाला हे धक्का देणारं आहे. आरओ फिल्टरमधून मिळणाऱ्या अगदी कमी टीडीएस असलेल्या पाण्यामुळे शरीराला आवश्यक खनिजांचं प्रमाण कमी होऊ शकतं. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेलं पाणी दोन्ही अपायकारक असू शकतं. त्यामुळे सावधान! ‘शुद्धते’च्या अतिरेकाने आपलं आरोग्य धोक्यात तर येत नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

लोकमतने शनिवारी शहरातील सिडकोतील जलकुंभ, छावणी-टिळकनगरातील आरो केंद्र, मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील हॉटेल, क्रांती चौकातील दुकान, पुंडलिनगरातील नळाचे पाणी व बीड बायपास येथील बोर, विहिरीचे व आरोच्या पाण्याची ‘टीडीएस’ चाचणी केली. यात अवघ्या ३० ते ४३० मि.ग्रॅ/लि. पर्यंतचे टीडीएस आढळून आले. आरो जार केंद्रात ३० ते ६० मि.ग्रॅ/लि. दरम्यान टीडीएसचे प्रमाण आढळून आले. मनपाच्या जलकुंभातील पाण्यात ३५० टीडीएस आढळून आले. याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी आरोग्यासाठी हितकारक नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मूत्ररोग तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर काय म्हणाले...१) पाण्यातील टीडीएस (टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स) म्हणजे पाण्यात विरघळलेले घनद्रव्य होय.२) पिण्याच्या पाण्यात आदर्श टीडीएसचे प्रमाण ५० ते १५० मि.ग्रॅ/लि. असले पाहिजे.३) ५० पेक्षा कमी टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला फिकट व नीरस लागते.४) १५० पेक्षा जास्त टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला कडवट लागते.५) पाण्यात कमी टीडीएस असेल तर कॅल्शियम, सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम वेगवेगळ्या खनिजांची मात्रा, शरीरात कमी होऊ शकते.६) कमी टीडीएसचे पाणी पिल्यास हाडे ठिसूळ होतात. सांध्यामध्ये त्रास होऊ शकतो. उदा. सोडियम कमी झाले तर चक्कर येऊ शकते.७) जास्त टीडीएसचे पाणी पिले तर खनिजांचे रक्तातील प्रमाण वाढू शकते. उदा. पोटॅशियम वाढले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.८) जागतिक आरोग्य संघटनेनुसार ३०० मि.ग्रॅ./लि. पेक्षा कमी टीडीएस असल्यास ते पाणी पिण्यायोग्य समजले जाते.९) पाण्याचे टीडीएस जास्त असल्यास पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. तसेच किडनीचे आजार होऊ शकतात.१०) जास्त टीडीएसचे पाणी पिणाऱ्यांमध्ये मुतखड्याचे आजार जास्त दिसून येतात.

पिण्याच्या पाण्यात आढळणारे रासायनिक व जैविक घटक व त्यांचे शरीरावर होणारे परिणामस्त्रोत : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील पाणी तपासणी प्रयोगशाळेतून मिळालेली माहिती.घटक (द्रव्य) - अतिरिक्त असल्यास शरीरावर होणारे परिणाम१) विरघळलेले क्षार (टीडीएस)- हृदयाशी संबंधित आजार, रक्तवाहिन्यांचे विकार, कर्करोगाचे आजार, पचनसंस्थेतील बिघाड.२) कठीणपणा - त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचारोग, मुतखडा३) अल्कलायनिटी - उलटी, अस्वस्थता४) क्लोराइड- पाण्यात खारटपणा जाणवतो.५) कॅल्शियम--- त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचा रोग, मुतखडा६) फ्लोराइड---हाडांचा ठिसूळपणा, उच्च रक्तदाब, दंतक्षय, दातांचा पिवळेपणा.७) लोह-- मधुमेह, पोटाचे विकार, फफ्फुस, पचनग्रंथी, हृदयाचे विकार.८) नायट्रेट- ब्लू बेबी सिंड्रोम.९) सल्फेट- हगवण लागणे.१०) कोलीफॉर्म--- उलट्या, मळमळ, गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ......................................... 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीHealthआरोग्य