शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 22, 2025 19:30 IST

सावधान! तुम्ही जास्त किंवा कमी टीडीएसचे पाणी पीत नाही ना !

छत्रपती संभाजीनगर : ‘शुद्ध पाणी म्हणजे आरोग्यदायीपाणी" असा समज बळावत चालला आहे. अतिशुद्ध पाणीच आरोग्य बिघडवत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. आपल्या शुद्ध पाण्याविषयीच्या समजाला हे धक्का देणारं आहे. आरओ फिल्टरमधून मिळणाऱ्या अगदी कमी टीडीएस असलेल्या पाण्यामुळे शरीराला आवश्यक खनिजांचं प्रमाण कमी होऊ शकतं. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेलं पाणी दोन्ही अपायकारक असू शकतं. त्यामुळे सावधान! ‘शुद्धते’च्या अतिरेकाने आपलं आरोग्य धोक्यात तर येत नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

लोकमतने शनिवारी शहरातील सिडकोतील जलकुंभ, छावणी-टिळकनगरातील आरो केंद्र, मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील हॉटेल, क्रांती चौकातील दुकान, पुंडलिनगरातील नळाचे पाणी व बीड बायपास येथील बोर, विहिरीचे व आरोच्या पाण्याची ‘टीडीएस’ चाचणी केली. यात अवघ्या ३० ते ४३० मि.ग्रॅ/लि. पर्यंतचे टीडीएस आढळून आले. आरो जार केंद्रात ३० ते ६० मि.ग्रॅ/लि. दरम्यान टीडीएसचे प्रमाण आढळून आले. मनपाच्या जलकुंभातील पाण्यात ३५० टीडीएस आढळून आले. याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी आरोग्यासाठी हितकारक नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मूत्ररोग तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर काय म्हणाले...१) पाण्यातील टीडीएस (टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स) म्हणजे पाण्यात विरघळलेले घनद्रव्य होय.२) पिण्याच्या पाण्यात आदर्श टीडीएसचे प्रमाण ५० ते १५० मि.ग्रॅ/लि. असले पाहिजे.३) ५० पेक्षा कमी टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला फिकट व नीरस लागते.४) १५० पेक्षा जास्त टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला कडवट लागते.५) पाण्यात कमी टीडीएस असेल तर कॅल्शियम, सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम वेगवेगळ्या खनिजांची मात्रा, शरीरात कमी होऊ शकते.६) कमी टीडीएसचे पाणी पिल्यास हाडे ठिसूळ होतात. सांध्यामध्ये त्रास होऊ शकतो. उदा. सोडियम कमी झाले तर चक्कर येऊ शकते.७) जास्त टीडीएसचे पाणी पिले तर खनिजांचे रक्तातील प्रमाण वाढू शकते. उदा. पोटॅशियम वाढले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.८) जागतिक आरोग्य संघटनेनुसार ३०० मि.ग्रॅ./लि. पेक्षा कमी टीडीएस असल्यास ते पाणी पिण्यायोग्य समजले जाते.९) पाण्याचे टीडीएस जास्त असल्यास पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. तसेच किडनीचे आजार होऊ शकतात.१०) जास्त टीडीएसचे पाणी पिणाऱ्यांमध्ये मुतखड्याचे आजार जास्त दिसून येतात.

पिण्याच्या पाण्यात आढळणारे रासायनिक व जैविक घटक व त्यांचे शरीरावर होणारे परिणामस्त्रोत : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील पाणी तपासणी प्रयोगशाळेतून मिळालेली माहिती.घटक (द्रव्य) - अतिरिक्त असल्यास शरीरावर होणारे परिणाम१) विरघळलेले क्षार (टीडीएस)- हृदयाशी संबंधित आजार, रक्तवाहिन्यांचे विकार, कर्करोगाचे आजार, पचनसंस्थेतील बिघाड.२) कठीणपणा - त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचारोग, मुतखडा३) अल्कलायनिटी - उलटी, अस्वस्थता४) क्लोराइड- पाण्यात खारटपणा जाणवतो.५) कॅल्शियम--- त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचा रोग, मुतखडा६) फ्लोराइड---हाडांचा ठिसूळपणा, उच्च रक्तदाब, दंतक्षय, दातांचा पिवळेपणा.७) लोह-- मधुमेह, पोटाचे विकार, फफ्फुस, पचनग्रंथी, हृदयाचे विकार.८) नायट्रेट- ब्लू बेबी सिंड्रोम.९) सल्फेट- हगवण लागणे.१०) कोलीफॉर्म--- उलट्या, मळमळ, गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ......................................... 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीHealthआरोग्य