शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

शिवसेनेच्या कचराफेकू नगरसेवकांच्या पदाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील राष्ट्रध्वजासमोर कचरा आणून टाकणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांभोवती कायद्याचा फास आवळला जाऊ लागला आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश देत पोलीस आयुक्तांना चौकशीच्या सूचना केल्या आहेतआयुक्त डॉ. निपुण विनायक यांनाही शासनाने या घटनेप्रकरणी स्वतंत्र टिपणी देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील राष्ट्रध्वजासमोर कचरा आणून टाकणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांभोवती कायद्याचा फास आवळला जाऊ लागला आहे. गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात नगरसेवक मकरंद कुलकर्णी, सीताराम सुरे, सचिन खैरे, मोहन मेघावाले, छावणी परिषदेचे नगरसेवक किशोर कच्छवाह यांच्यासह तीन नगरसेवक पती आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रध्वजासमोरील व्हरांड्यात ८ ते १० टन कचरा आणून टाकला. 

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश देत पोलीस आयुक्तांना चौकशीच्या सूचना केल्या आहेत, तसेच महापालिका प्रशासनाकडून कचऱ्याची वाहने कुणाची होती, संबंधित विभागाची जबाबदारी कुणाची होती, यासह आंदोलकांची माहिती मागविली आहे. महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनाही शासनाने या घटनेप्रकरणी स्वतंत्र टिपणी देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. आयुक्तांनी नगरसेवकांच्या वर्तणुकीबाबत काही अहवाल दिला, तर त्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरसेवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याचाही हातभार त्यांचे पद रद्द करण्याबाबत लागू शकतो. 

विधिज्ञांच्या मते कारवाई होऊ शकतेशहरातील काही विधिज्ञांना याप्रकरणी विचारले असता, त्यांनी सांगितले की, नगरसेवकांचे पद जाण्याबाबत कारवाई होऊ शकते; परंतु त्यासाठी मनपा आयुक्तांनी वर्तणुकीबाबत शासनाला अहवाल दिला तर कारवाई होणे शक्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील राष्ट्रध्वजस्तंभासमोर शिवसेना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी कचरा आणून टाकल्यामुळे प्रशासकीय प्रमुखांचा मुख्यमंत्र्यांपासून सचिवांनी खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह पालिका आयुक्तांना याप्रकरणी विशेष अशा सूचना केल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात फेकलेला कचरा हा शासनावरच फेकल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण शासन किती गांभीर्याने घेते, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv Senaशिवसेना