पदमपुऱ्यात १४ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे
By Admin | Updated: May 6, 2014 21:41 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-06T21:41:53+5:30
औरंगाबाद : पदमपुरा येथे जागेच्या वादावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात क्रांतीचौक पोलिसांनी दोन्ही गटांतील १४ जणांविरुद्ध दंगल, विनयभंग व मारामारीचे गुन्हे दाखल केले आहेत.

पदमपुऱ्यात १४ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे
औरंगाबाद : पदमपुरा येथे जागेच्या वादावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात क्रांतीचौक पोलिसांनी दोन्ही गटांतील १४ जणांविरुद्ध दंगल, विनयभंग व मारामारीचे गुन्हे दाखल केले आहेत.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पदमपुरा येथील जगजीवनराम हाऊसिंग सोसायटीच्या जागेवरून दोन गटांत वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार हंसराज नारायण बन्सवाल, गोकुळ बन्सवाल, सूर्यप्रकाश बन्सवाल, संजय बन्सवाल, अन्साराम लोधे, देवानंद बन्सवाल, जगदीश रमंडवाल, हरी मन्नालाल गांगवे, अशोक बन्सवाल, गोपाल ओझा, सचिन खंडू जीवनवाल, अनिल जीवनवाल, भारत बरतुने, कुलदीप जाटवे, दीपक जीनवाल या १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोहर बन्सवाल याच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.