शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समितीच्या अहवालाची समिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 00:53 IST

लातूर : रेणापूर तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका होता़ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन

लातूर : रेणापूर तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका होता़ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती़ दरम्यान, यात काही अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करीत जि़ प़ सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गदारोळ केला होता़ त्यामुळे पुन्हा तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नियुक्त केली होती़ या चौकशी समितीचा अहवाल सीईओंकडे प्राप्त झाला असून, त्यावर समिक्षा चालू आहे़ या अहवालात नेमके दडले काय हे गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत समोर येणार आहे़ लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत रेणापूर पंचायत समितीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामपंचायतीमार्फत नाला बल्डींग, नाला सरळीकरण, वृक्षारोपण, रोपवाटीका तसेच जलसंधारणाची कामे केली होती़ या कामात अनियमितता झाल्याचे जुन्या चौकशी समितीने ठपका ठेवला होता़ तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांकडून या कामातील १ कोटी २२ लाख ४४ हजार रुपयाची वसुली करावी, असे आदेश दिले होते़ या आदेशाचे पत्र मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून दडविले होते, असा ठपका ३ महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता़ जिल्हा परिषद सदस्य यावर आक्रमक झाल्याने पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षांनी ३ सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली़ या चौकशी समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे़ दरम्यान, या अहवालाची जि़प़ प्रशासनाकडून समिक्षा करण्यात येत आहे़ पंचायत विभागाकडून समिक्षा झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे या अहवालावर अभिप्राय मागविला जाणार आहे़ २३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत या दोन्ही विभागाकडून या अहवालावर समिक्षा होणार आहे़ सर्वसाधारण सभेत वादंग उठल्यानंतर २७ जून रोजी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती़ या समितीला ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते़ मात्र ७ दिवसात अहवाल प्राप्त होऊ शकला नाही़ तब्बल १५ ते २० दिवसानंतर अहवाल सादर झाला आहे़ या अहवालात नेमके काय आहे, याकडे लक्ष लागले आहे़ २३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊनच संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याकडे दाखल झालेला अहवाल पंचायत विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्याची समिक्षा सुरु आहे़ कार्यवाहीतून कोणी सुटले आहे का, या प्रकरणाला विलंब का झाला, झाला असेल तर तो का झाला, याची समिक्षा पंचायत विभागही करीत आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी दिली़ ४तीन सदस्यीय समितीच्या चौकशी अहवालावर पंचायत विभागाकडून समिक्षा झाल्यानंतर पुन्हा तो सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला जाणार आहे़ त्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार आहे़ त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत कृषी विकास अधिकारी मोहन भिसे, रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे यांचा समावेश आहे़ या समितीने पुन्हा रेणापूर तालुक्यात झालेल्या ‘त्या’ कामाच्या अनुशंगाने चौकशी केली आहे़ विभागीय चौकशीत तीन अधिकारी प्रस्तावित होते़ यात कुणी राहिले आहे का, कारवाईला का विलंब झाला, ते पत्र कुणी दडविले होते़ या अनुशंगाने अहवाल असण्याची शक्यता आहे़ मात्र हा अहवाल २३ जुलै रोजी होणाऱ्या सभेतच सदनापुढे येणार आहे़ तीन सदस्यीय समितीच्या अहवालाची पंचायत, सामान्य प्रशासनाकडून समिक्षा झाल्यानंतर सर्वसाधारण सभेतही त्यावर चर्चा होणार आहे़ या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, म्हणून ही प्रक्रिया करण्यात आली असल्याचे जि़प़ सूत्रांकडून सांगण्यात आले़