शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
4
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
5
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
6
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
7
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
8
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
9
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
10
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
11
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
12
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
13
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
14
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
15
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
16
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
17
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
18
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
19
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
20
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

चौकशी समितीच्या अहवालाची समिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 00:53 IST

लातूर : रेणापूर तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका होता़ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन

लातूर : रेणापूर तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका होता़ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती़ दरम्यान, यात काही अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करीत जि़ प़ सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गदारोळ केला होता़ त्यामुळे पुन्हा तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नियुक्त केली होती़ या चौकशी समितीचा अहवाल सीईओंकडे प्राप्त झाला असून, त्यावर समिक्षा चालू आहे़ या अहवालात नेमके दडले काय हे गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत समोर येणार आहे़ लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत रेणापूर पंचायत समितीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामपंचायतीमार्फत नाला बल्डींग, नाला सरळीकरण, वृक्षारोपण, रोपवाटीका तसेच जलसंधारणाची कामे केली होती़ या कामात अनियमितता झाल्याचे जुन्या चौकशी समितीने ठपका ठेवला होता़ तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांकडून या कामातील १ कोटी २२ लाख ४४ हजार रुपयाची वसुली करावी, असे आदेश दिले होते़ या आदेशाचे पत्र मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून दडविले होते, असा ठपका ३ महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता़ जिल्हा परिषद सदस्य यावर आक्रमक झाल्याने पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षांनी ३ सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली़ या चौकशी समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे़ दरम्यान, या अहवालाची जि़प़ प्रशासनाकडून समिक्षा करण्यात येत आहे़ पंचायत विभागाकडून समिक्षा झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे या अहवालावर अभिप्राय मागविला जाणार आहे़ २३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत या दोन्ही विभागाकडून या अहवालावर समिक्षा होणार आहे़ सर्वसाधारण सभेत वादंग उठल्यानंतर २७ जून रोजी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती़ या समितीला ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते़ मात्र ७ दिवसात अहवाल प्राप्त होऊ शकला नाही़ तब्बल १५ ते २० दिवसानंतर अहवाल सादर झाला आहे़ या अहवालात नेमके काय आहे, याकडे लक्ष लागले आहे़ २३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊनच संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याकडे दाखल झालेला अहवाल पंचायत विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्याची समिक्षा सुरु आहे़ कार्यवाहीतून कोणी सुटले आहे का, या प्रकरणाला विलंब का झाला, झाला असेल तर तो का झाला, याची समिक्षा पंचायत विभागही करीत आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी दिली़ ४तीन सदस्यीय समितीच्या चौकशी अहवालावर पंचायत विभागाकडून समिक्षा झाल्यानंतर पुन्हा तो सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला जाणार आहे़ त्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार आहे़ त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत कृषी विकास अधिकारी मोहन भिसे, रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे यांचा समावेश आहे़ या समितीने पुन्हा रेणापूर तालुक्यात झालेल्या ‘त्या’ कामाच्या अनुशंगाने चौकशी केली आहे़ विभागीय चौकशीत तीन अधिकारी प्रस्तावित होते़ यात कुणी राहिले आहे का, कारवाईला का विलंब झाला, ते पत्र कुणी दडविले होते़ या अनुशंगाने अहवाल असण्याची शक्यता आहे़ मात्र हा अहवाल २३ जुलै रोजी होणाऱ्या सभेतच सदनापुढे येणार आहे़ तीन सदस्यीय समितीच्या अहवालाची पंचायत, सामान्य प्रशासनाकडून समिक्षा झाल्यानंतर सर्वसाधारण सभेतही त्यावर चर्चा होणार आहे़ या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, म्हणून ही प्रक्रिया करण्यात आली असल्याचे जि़प़ सूत्रांकडून सांगण्यात आले़