शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अवैध वाळू उपसाप्रकरणी महसूल प्रशासनाचीच जबाबदारी, विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मांडली स्पष्ट भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 12:54 IST

९० टक्के जबाबदारी ही महसूल प्रशासनाचीच आहे.वाळू उपशाचे कंत्राट कोणाला सुटले, त्याचे नाव काय, याची सर्व माहितीच महसूलकडे असते.

औरंगाबाद : लाच घेणे हा नि:संशय गुन्हाच आहे. मात्र अवैध वाळू उपसा प्रकरणात नियंत्रण ठेवणे आणि कारवाईची जबाबदारी ही महसूल प्रशासनाची आहे, असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलीसच लाचखोरीत सापडत असल्याच्या मुद्दयावर मंगळवारी मांडले.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या वार्षिक तपासणीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अवैध वाळू उपसा प्रकरणात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, ९० टक्के जबाबदारी ही महसूल प्रशासनाचीच आहे. तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत यासंदर्भातील यंत्रणा असते. वाळू उपशाचे कंत्राट कोणाला सुटले, त्याचे नाव काय, याची सर्व माहितीच महसूलकडे असते. बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणात मागील काही दिवसांमध्ये ९ जणांचे बळी गेले असून, यामध्ये पोलीसच लाचखोरीत सापडत असल्याच्या मुद्दयावर त्यांनी हे स्पष्टिकरण केले.

पोलिसांना तणावमुक्त काम...तणावविरहित कामाची एक पद्धत ठरवण्यात आलेली आहे. त्यासाठी तपासी अधिकारी हे २१९ वरून ३१० पर्यंत केलेले आहेत. शिवाय वर्षभरात केवळ ३० प्रकरणांचाच तपास त्यांना करावयाचा आहे. त्यातही तपास कामांच्यासंदर्भाने संबंधित तपासी अधिकाऱ्यास वेळेचे बंधन असून, ६० दिवसांत दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यास बक्षीसही देण्यात येत आहे. वर्षभरात ३ हजार २३६ बक्षिसे देण्यात आली आहेत. याचा परिणाम म्हणजे तपास रखडण्याची प्रकरणे अत्यंत कमी झालेली आहेत. २०१९ मधील केवळ २ प्रकरणांचा तपास बाकी आहे, तर २०२० ची ४९ प्रकरणेच शिल्लक आहेत, असेही विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बनसोड उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीsandवाळू