शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:08 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोन जणांना जीव गमवावा लागला. औरंगाबादसह राज्यभरात या मागणीची तीव्रता वाढली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असा ठराव गुरुवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत पारित करण्यात आला.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा : सर्वच सदस्यांनी व्यक्त केली आग्रही भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोन जणांना जीव गमवावा लागला. औरंगाबादसह राज्यभरात या मागणीची तीव्रता वाढली आहे. तरीही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असा ठराव गुरुवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत पारित करण्यात आला.जिल्हा परिषदेची ही नियोजित बैठक दुपारी अडीच वाजता सुरू झाली. तेव्हा जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष केशव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कायगाव टोका येथे गोदावरी नदीत जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना सभागृहाने श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सदस्य अविनाश गलांडे व किशोर बलांडे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर सभागृहाचे लक्ष वेधले. मागील वर्षभरात मराठा समाजाचे ५७-५८ मोर्चे निघाले. मुख्यमंत्र्यांनी त्या मोर्चांची दखलही घेतली नाही. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. परवा कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदापात्रात उडी मारून जलसमाधी घेतली, तर कन्नड तालुक्यात एकाने विष प्राशन करून जीव दिला. आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री निर्णय घेण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. मराठा समाजाला विनाविलंब आरक्षण लागू करावे, आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत जाहीर केलेली मेगाभरती रद्द करण्यात यावी, असे ठराव या बैठकीत संमत करण्यात आले.या अनुषंगाने सदस्य रमेश गायकवाड यांनी मुद्दा उपस्थित केला की, ओबीसींच्या आरक्षणाला कोणतीही बाधा न पोहोचवता मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिले पाहिजे. या आरक्षणाचा समावेश घटनेच्या अनुसूची ९ मध्ये करावा. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांप्रमाणे स्वतंत्र २३ टक्के आरक्षणाची तरतूद करावी. विधिमंडळात यासंबंधात निर्णय घेऊन दुरुस्ती विधेयक संसदेत मंजुरीसाठी पाठविले जावे. भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे यांनीही मराठा आरक्षणाबाबत शासनाने विनाविलंब निर्णय घ्यावा, या बाजूने सभागृहात आपली भूमिका मांडली.सदस्य- पदाधिकारी देणार महिनाभराचे मानधनस्थायी समितीच्या बैठकीत किशोर बलांडे यांनी जिल्हा परिषदेच्या उपकरातून मयत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा ठराव मांडला. त्यानंतर बांधकाम सभापती विलास भुमरे यांनीही हाच धागा पकडून प्रशासनाने आर्थिक तरतूद करण्याची आग्रही भूमिका घेतली.तेव्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले की, जि.प.च्या अर्थसंकल्पात यासंदर्भात तरतूद नाही. अशा प्रकारे आर्थिक मदत करणारे लेखाशीर्षदेखील नाही. तेव्हा उपस्थित सदस्यांनी अर्थसंकल्पात अशा प्रकारची तरतूद करण्याची मागणी केली.त्यावर जाधव म्हणाले, आता मध्येच अर्थसंकल्पात तरतूद करता येत नाही. तेव्हा उपस्थित सदस्यांनी जि.प.चे सर्व पदाधिकारी, सदस्यांचे एक महिन्याचे मानधन तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मिळून १० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करावी, असा तोडगा काढला. यासाठी सर्व कर्मचारी- अधिकाºयांची बैठक आयोजित करण्यासाठी जाधव यांना सांगण्यात आले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस