शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाने खंडपीठात औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:17 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांत शहरात जागोजागी केलेली कचऱ्याची विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने केली आहे. एवढेच नव्हे तर ...

ठळक मुद्देशहरात अद्यापही काही ठिकाणीच ६० ते ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ३० ते ४० टक्के ठिकाणी अजूनही ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही.

औरंगाबाद : महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांत शहरात जागोजागी केलेली कचऱ्याची विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने केली आहे. एवढेच नव्हे तर जकात नाका व आकाशवाणी चौक व अन्य परिसरात कचरा जाळून टाकणे हेसुद्धा शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, असे शपथपत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दाखल केले आणि न्यायालयात मनपाचे पितळ उघडे पडले. 

बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस.एम. गव्हाणे यांच्या समोर याचिकाकर्ते, मनपा व राज्य, केंद्र शासनाच्या वकिलांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला.  महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने शपथपत्र दाखल केले. त्यात त्यांनी महानगरपालिकेचे सर्व दावे फेटाळून लावले.

शहरात अद्यापही काही ठिकाणीच ६० ते ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ३० ते ४० टक्के ठिकाणी अजूनही ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही. मनपाने जागोजागी खड्डे करून कचरा पुरला आहे. त्याचे सेंद्रिय खत तयार करणार असे सांगितले जात आहे; पण प्रत्यक्षात सर्वकाही अशास्त्रीय पद्धतीने केले जात असल्याचे मंडळाने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर कचरा गोळा करण्याची पद्धत, ओला-सुका वर्गीकरण करण्याची पद्धत व साठविलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत सर्व नियमबाह्य असल्याचा दावाही मंडळाने केला. मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांच्या वतीने अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांनी तर  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अ‍ॅड. उत्तम बोदर तर मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशमुख, अन्य याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. व्ही.डी. सपकाळ, अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले. आज सुनावणी पावणेदोन तास चालली.

चिकलठाण्यातच कचऱ्यावर होणार प्रक्रिया -मनपामुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर आज मनपाच्या वतीने सांगण्यात आले की, चिकलठाणा येथील गट २३१ मधील दुग्धनगरीतील ३ एकर जागेत ओला कचरा व २ एकर जागेत सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासंदर्भात सुस्पष्ट शपथपत्र सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. यावेळी १० एप्रिल रोजी शपथपत्र दाखल करण्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी वेळ मागवून घेतला. 

मनपावर प्रशासक, पुढील सुनावणी १० रोजी महानगरपालिका शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे.  यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्यासमोर आज सुनावणी झाली.  मनपाच्या वतीने अ‍ॅड. जयंत शहा यांनी युक्तिवाद केला. मनपाच्या कारभारावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. प्रशासक नेमण्यासाठी अ‍ॅड. शहा यांनी शपथपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. कचरा प्रश्न व चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणी व मनपावर प्रशासक नेमण्यासंदर्भातील एकत्रित सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोpollutionप्रदूषण