शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाने खंडपीठात औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:17 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांत शहरात जागोजागी केलेली कचऱ्याची विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने केली आहे. एवढेच नव्हे तर ...

ठळक मुद्देशहरात अद्यापही काही ठिकाणीच ६० ते ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ३० ते ४० टक्के ठिकाणी अजूनही ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही.

औरंगाबाद : महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांत शहरात जागोजागी केलेली कचऱ्याची विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने केली आहे. एवढेच नव्हे तर जकात नाका व आकाशवाणी चौक व अन्य परिसरात कचरा जाळून टाकणे हेसुद्धा शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, असे शपथपत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दाखल केले आणि न्यायालयात मनपाचे पितळ उघडे पडले. 

बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस.एम. गव्हाणे यांच्या समोर याचिकाकर्ते, मनपा व राज्य, केंद्र शासनाच्या वकिलांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला.  महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने शपथपत्र दाखल केले. त्यात त्यांनी महानगरपालिकेचे सर्व दावे फेटाळून लावले.

शहरात अद्यापही काही ठिकाणीच ६० ते ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ३० ते ४० टक्के ठिकाणी अजूनही ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही. मनपाने जागोजागी खड्डे करून कचरा पुरला आहे. त्याचे सेंद्रिय खत तयार करणार असे सांगितले जात आहे; पण प्रत्यक्षात सर्वकाही अशास्त्रीय पद्धतीने केले जात असल्याचे मंडळाने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर कचरा गोळा करण्याची पद्धत, ओला-सुका वर्गीकरण करण्याची पद्धत व साठविलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत सर्व नियमबाह्य असल्याचा दावाही मंडळाने केला. मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांच्या वतीने अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांनी तर  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अ‍ॅड. उत्तम बोदर तर मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशमुख, अन्य याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. व्ही.डी. सपकाळ, अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले. आज सुनावणी पावणेदोन तास चालली.

चिकलठाण्यातच कचऱ्यावर होणार प्रक्रिया -मनपामुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर आज मनपाच्या वतीने सांगण्यात आले की, चिकलठाणा येथील गट २३१ मधील दुग्धनगरीतील ३ एकर जागेत ओला कचरा व २ एकर जागेत सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासंदर्भात सुस्पष्ट शपथपत्र सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. यावेळी १० एप्रिल रोजी शपथपत्र दाखल करण्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी वेळ मागवून घेतला. 

मनपावर प्रशासक, पुढील सुनावणी १० रोजी महानगरपालिका शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे.  यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्यासमोर आज सुनावणी झाली.  मनपाच्या वतीने अ‍ॅड. जयंत शहा यांनी युक्तिवाद केला. मनपाच्या कारभारावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. प्रशासक नेमण्यासाठी अ‍ॅड. शहा यांनी शपथपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. कचरा प्रश्न व चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणी व मनपावर प्रशासक नेमण्यासंदर्भातील एकत्रित सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोpollutionप्रदूषण