शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

लहरी पावसाने त्रस्त मराठवाड्याला दिलासा; ११ धरणे जोडून वॉटरग्रीडने १३ हजार गावांना पाणी

By मुजीब देवणीकर | Updated: November 7, 2023 16:40 IST

केंद्रीय पथकाकडून चर्चा, लवकरच मंजुरीची प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील १३ हजार गावांचा पाणीप्रश्न वॉटरग्रीडद्वारे कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक मुद्यांची दोन दिवसांपूर्वीच केंद्राच्या समितीने दौरा करून माहिती घेतली. अंतिम प्रस्ताव लवकरच केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयास सादर केला जाणार आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटरग्रीड योजनेतील अडथळ्यांची शर्यत पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. लवकरच योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मराठवाड्यात दरवर्षी लहरी स्वरूपाचा पाऊस पडतो. एखाद्या वर्षी जास्त, तर दुसऱ्या वर्षी अत्यल्प अशी परिस्थिती असते. यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.अनेक भागांत पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने वॉटरग्रीड अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. यात विभागातील ११ मोठी धरणे एकमेकांशी जोडून विभागातील १३ हजार गावांच्या पिण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निश्चित झाले. त्यासाठी राष्ट्रीय जलजीवन मिशनअंतर्गत मान्यता मिळविण्यासाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाकडे सादर केला होता. प्रस्तावावर केंद्राच्या समितीने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते. या मुद्यांची पूर्तता करण्यात आली आहे.

केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीसोबत १९ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यात नोव्हेंबरमध्ये अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी केंद्रीय समिती राज्य दौऱ्यावर येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाचे हे पथक २ ते ४ नोव्हेंबर यादरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. यात पथक प्रमुख राणा रमेश सिंह, ग्रामीण पायाभूत सल्लागार देवेंद्र कुमार आणि वरिष्ठ ग्रामीण पायाभूत सल्लागार जयप्रकाश यांचा समावेश होता. त्यांनी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशन अभियानचे संचालक अमित सैनी, विशेष कार्य अधिकारी तथा मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता राम लोलापोड, अधीक्षक अभियंता महेश पाटील, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर अभ्यासपूर्ण चर्चा करून अहवाल तयार केला. हा अहवाल केंद्राला सादर केला जाणार असून, त्यानुसार प्रकल्पास मंजुरी मिळणार आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद