शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

वाहनचोरीची वेगळ्या रजिस्टमध्ये नोंद; अपयश झाकण्यासाठी गुन्हे नोंदविण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 18:24 IST

चोरट्यांकडून वाहने जप्तीनंतर नोंदविले गुन्हे

ठळक मुद्देवाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी लपविले वर्षभरापासून शहरात प्रतिदिन सरासरी तीन दुचाकी चोरीला

औरंगाबाद :  वाहनचोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आता पोलिसांनी वाहनचोरीचे गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ सुरू केल्याचे समोर आले आहे. जून आणि आॅगस्टमध्ये चोरी झालेल्या दुचाकी गुन्हेशाखेकडून चोरट्यांनी हस्तगत केल्याची माहिती मिळाल्यानंतर हर्सूल पोलिसांनी वाहनचोरीचे गुन्हे नोंदविले.  

वर्षभरापासून शहरात  प्रतिदिन सरासरी  तीन दुचाकी चोरटे पळवित आहेत. यासोबतच तीनचाकी रिक्षा, मालवाहू ट्रक आणि कारही चोरीला जात आहेत.  वाहनचोरी रोखण्यासाठी गुन्हेशाखेसोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. याकरीता प्रत्येक ठाण्यात डी.बी. पथक कार्यरत असते. शहरातील सिडको, एमआयडीसी सिडको आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाकडून दुचाकी चोरट्यांविरोधात भरीव कामगिरी सुरू आहे.  गुन्हेशाखेने सहा महिन्यात  दुचाकीचोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणले. मात्र अन्य पोलीस ठाण्यांकडून वाहनचोरी रोखण्यासाठी ऐवजी गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे  समोर आले. वाहनचोरीच्या जुन्या घटनांपैकी हर्सूल परिसरातील जहांगीर कॉलनीत राहणाऱ्या शेख शोएब बक्ष शेख अफसर यांचा घरासमोर उभी  मोटारसायकल ( एमएच-४८झेड ४१८९) चोरट्यांनी १० जूनच्या रात्री पळविली होती. तसेच चेतनानगर येथील कडूबा पुंडलिक साळवे यांची मोटारसायकल ( एमए-२०सीडी ७६६९) १८ आॅगस्ट रोजी चोरीस गेली.   ८ सप्टेंबर रोजी गुन्हेशाखेने चोरट्यांकडून या दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या. यानंतर हर्सूल पोलिसांनी फिर्यादीकडून वाहनचोरीची स्वतंत्र तक्रार नोंदवून घेतली.  टी व्ही सेंटर रस्त्यावरील वाहनतळावर अ‍ॅड. हर्षद भागचंद शिंदे यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच-२०डीएस ४५३९) चोरट्यांनी चोरून नेली होती. ही घटना २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.  याबाबत त्यांनी ८ सप्टेंबर रोजी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली. ईस्माईल गौस खान यांची दुचाकी (एमएच-२०सीडी ३८२५) चोरट्यांनी पळविली.  दुसऱ्या दिवशी ईस्माईल खान यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार  नोंदविली.

वाहन चोरीची रजिस्टमध्ये नोंदवाहनचोरीची तक्रार देण्यासाठी ठाण्यात आलेल्या व्यक्तीची तातडीने गुन्हा नोंदवून घेण्याची जबाबदारी ठाणेदाराची असते. मात्र वाहनचोरीची केवळ नोंद एका रजिस्टरमध्ये  केली जात आहे. याकरीता प्रत्येक ठाणेदारांनी असे रजिस्टर ठेवले आहेत . गुन्हाच नोंद न झाल्याने वाहनचोरीचा तपास होत नाही. एवढेच नव्हेतर गाडीचा शोध घ्या असा सल्ला तक्रारदाराला देऊन पोलीस मोकळे होतात.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस