शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

वसुली थंडावली

By admin | Updated: December 28, 2015 00:23 IST

राजेश खराडे , बीड महावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे.

राजेश खराडे , बीडमहावितरणची थकबाकी एक हजार कोटीच्या घरात आहे. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकताच नसल्याने ग्रहकांना सेवा देण्यास महावितरण अयशस्वी ठरत आहे. महिन्याकाठी सरासरी इतकीही वसुली होत नसल्याने थकबाकीचा आकडा एक हजार कोटी १९ लाख एवढा फुगला आहे.बीले अदा होत नसल्यानेच भारनियमनाची नामुष्की येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे सुरळीत सेवाच मिळत नसल्याचा ग्राहकांचा ठपका आहे. वाढती थकबाकी आणि ग्राहकांना मिळणारी सेवा याचा ताळमेळ लागत नसल्याने सध्या महावितरण कार्यालयाची कोंडी झाली आहे. जिल्ह्यात घरगुती, कृषी, व्यापारी, औद्योगिक, पाणी पुरवठा विभाग, पथदिवे आदी विभगातील ग्रहकांची संख्या दोन लाखांच्या घरात असून थकबाकी एक हजार ६३ कोटी ५२ लाख ऐवढी आहे. अंबाजोगाई व बीड अर्बन वगळता विभगाला महिन्याकाठी सरासरी इतकी वसुली करण्यास यश मिळालेले नाही. वसुलीत अडथळा थकबाकीचा वाढता आकडा हाच ग्रहकांना सेवा देण्यास कारणीभूत ठरत आहे. विज बीलाचे वाटप करण्याचे काम नेमूण दिलेल्या एजन्सी करीत आहेत. वसुलीचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. महिन्याकाठी सर्वाधिक तक्रारी या बिले वेळेवर मिळत नसल्याच्या आहेत. त्यामुळे वसुलीकरिता एक ना अनेक मोहिमा राबवूनही समाधानकारक वसुली होत नाही. एजन्सीकडून नियमित बिलांचे वाटप व बिले अदा करण्याविषयी ग्राहकांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पुरवठा विभागाकडून दुजाभावविभागाकडून उत्पन्न तर सोडाच अधिकचा तोटा सहन करावा लागत असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून साहित्य पुरविण्यास दुजाभाव केला जात आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रत्येक विभागाला १०० रोहित्रे दिली जातात. असे असतानाही यंदा बीड विभागाला केवळ १० रोहित्रांची बोळवण केली होती. शिवाय गुत्तेदारांचेच पैसे महावितरणकडे असल्याने दोन वर्षापासून लहान-मोठी दुरूस्तीची कामे रखडलेली आहे. साहित्याचा पुरवठा होत नसल्यानेच दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. रोहित्रांचा प्रश्न कायमबारमाही रोहित्रांचा प्रश्न कायम राहिलेला आहे. हंगामी काळात विभागाला ४०० रोहित्रांची आवश्यकता होती. तशी मागणीही विभागीय कार्यालयाकडून करण्यात आलेली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर याची पूर्तता हंगाम संपत आला तरी झालेलीच नाही. त्यामुळे थोड्या-बहूत प्रमाणावर पाणी असतानाही शेतकरी हतबल झाले होेते. रबी हंगामाच्या अंतिम टप्प्यात विभागाला केवळ २० रोहित्रांची बोळवण करण्यात आलेली होती. पोकळ आश्वासने उर्जामंत्र्याच्या आढावा बैठकीत योजना आणि आश्वासंनाचा झालेला पाऊस प्रत्यक्षात मात्र बरसलाच नाही. पंधरा दिवसांत रिक्त पदे भरून दोन दिवसांत २०० रोहित्र देणार असल्याचे उर्जामंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत सांगितले होते. त्यापैकी आठ दिवसांपूर्वी परभणी येथून १० व पुणे विभागाकडून १० अशी २० रोहित्रे देण्यात आलेली आहेत.