शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरणाऱ्यांत हेल्मेटच्या सर्वाधिक केसेस; लॉकडाऊनमध्ये नागरिक, वाहनधारकांकडून अडीच कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 13:02 IST

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका, पोलिसांकडून कारवाई

ठळक मुद्देवाहतुकीचे आणि कोरोनाचे नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत. असंख्य नागरिक या नियमांचे पालन करायला तयार नाहीत.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोना काळात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांनी, वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केले. महापालिकेने मास्क न लावलेल्या नागरिकांवर कारवाई करीत १ काेटी ४६ लाख रुपये दंड वसूल केला. पोलिसांनी १ कोटी २ लाख रुपये वाहनधारकांकडून वसूल केले.

कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत होते. मात्र, असंख्य नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करताना आढळून आले. पहिल्या लाटेत कोरोनाबद्दल प्रचंड भीती नागरिकांमध्ये होती. घराबाहेर पडताना अनेकदा विचार करावा लागत होता. दुसऱ्या लाटेत नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतले नाही. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्यात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स ठेवावे, गर्दी करू नये, असे साधे सोपे नियम ठरवून देण्यात आले आहेत. असंख्य नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करताना आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मनपाने नागरी मित्र पथक स्थापन केले. पथकातील ७०पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी दररोज कारवाई केली. प्रत्येक नागरिकाला प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत होता. आत्तापर्यंत या पथकांनी १ कोटी ४६ लाख रुपये दंड वसूल केला. त्याचप्रमाणे पोलिसांनीही मागील तीन महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. २९ हजार ४८५ केसेस करण्यात आल्या. १ कोटी २ लाख २२ हजार १६०० रुपये वसूल केले.

हेल्मेटच्या सर्वाधिक केसेसपोलिसांनी हेल्मेटचा वापर न केल्याबद्दल ११ हजार १६१ नागरिकांना दंड आकारला. त्यांच्याकडून ५ लाख ५८ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. चारचाकी वाहन चालवित असताना सीट बेल्टचा वापर न केल्याने ५ हजार ३८२ वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १० लाख ७६ हजार रुपये दंड वसूल केला. फॅन्सी नम्बर प्लेट वापरणाऱ्यांकडून ६ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला.

वाहतूक, कोरोनाचे नियम सुरक्षेसाठीचवाहतुकीचे आणि कोरोनाचे नियम नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत. मात्र, असंख्य नागरिक या नियमांचे पालन करायला तयार नाहीत. महापालिका, पोलिसांकडून वारंवार या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येते. त्याचा काहीच उपयोग होत नाही.

व्यापक प्रमाणात कारवाईलॉकडाऊन काळात कमीत कमी नागरिक रस्त्यावर असावेत, यासाठी प्रत्येक वाहनधारकांची नाकाबंदीत विचारपूस केली जात होती. विनाकारण वाहन घेऊन बाहेर पडलेल्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लॉकडाऊनचा कालावधी जास्त होता. यामुळे व्यापक प्रमाणात कारवाई झाली.- मुकुंद देशमुख, शहर वाहतूक निरीक्षक

असा झाला दंड वसूल :

वाहन चालवताना मोबाइलचा वापर - ४, ३४, ०००विनासीट बेल्ट वाहन चालविणे -१०,७६,४००मास्कचा वापर न करणे - १ कोटी ४६ लाखहेल्मेटचा वापर न करणे - ५,५८,५००ट्रिपल सीट - ५, ३४, २००फॅन्सी नंबर प्लेट - ६,७५,२००नो पार्किंग - ३,५२,८००विनालायसन्स - १५,६८,५००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliceपोलिस