शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘त्यांच्या’ कुटुंबांची पुन्हा पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:09 IST

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब घरातील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली.

ठळक मुद्देआयुक्तांची माहिती : शेतकऱ्यांच्या दारी प्रशासनासह एनजीओचे प्रतिनिधी जाणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब घरातील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली. परंतु ही माहिती मंडळस्तरावर महसूल कर्मचा-यांनी कागदोपत्रीच संकलित केल्याचे दोन दिवसांपूर्वी एका परिषदेत समोर आले. प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त एक जाणीव म्हणून पाहणी करण्यात आली होती. ४ एप्रिलपासून नव्याने पाहणी करण्यात येणार असून, यावेळी महसूल कर्मचा-यांसोबत एनजीओचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कुटुंबांना जीवन जगण्याचे साधन हवे असून, त्यांनी आपल्या गरजा आणि व्यथा दोन दिवसांपूर्वी झालेल्या परिषदेत मांडल्या होत्या. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील ४६५ मंडळांतील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांना पाठविले होते. त्याचा अहवाल ७ डिसेंबर २०१७ रोजी तयार झाल्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ३,९५१ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या दारी प्रशासन अधिकारी गेलेच नाहीत. आठही जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांतील सदस्यांशी त्यांनी चर्चाच केली नाही. कागदोपत्री अहवाल सादर करून ते कर्मचारी मोकळे झाले होते. त्या कुटुंबांची पुढच्या महिन्यापासून नव्याने पाहणी करण्यात येणार आहे.

रोजगाराभिमुख प्रशिक्षण, आरोग्य उपचार, कर्ज पुरवठा, वैरण विकास योजनेचा लाभ, वीज जोडणी, विहीर, शेततळे, गॅस जोडणी, राष्ट्रीय अन्न सुरक्षेतून धान्य पुरवठा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, सामूहिक विवाह योजना, वसतिगृहाची सुविधा, शौचालय, घरकुल योजना, जन-धन बँक खाते, अर्थसहाय्य योजना, वेतन योजनांच्या अनुषंगाने गेल्या वर्षी पाहणी करण्यात आली होती. पुढील महिन्यात याच धर्तीवर पाहणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयDr Purushottam Bhapkarडॉ पुरुषोत्तम भापकरWomenमहिलाFamilyपरिवार