शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

'मराठवाड्यासाठी पाणी सुटेपर्यंत रास्तारोको सुरूच राहणार';आक्रमक आंदोलनाने जालना रोड ठप्प

By बापू सोळुंके | Updated: November 20, 2023 13:42 IST

जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी रोखून धरले आहे. यामुळे मराठवाड्यातील जनतेमध्ये संताप आहे. आज सकाळी सिंचन भवनसमोर जालना रोडवर हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी सर्वपक्षीय रस्तारोको करण्यात येत आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संघटना सहभागी झालेल्या या रस्तारोकोने जालना रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. 

यावेळी जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला. आंदोलनात सहभागी नेत्यांची पाणीप्रश्नावर एकजूट दिसून आली. या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाठ, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे ,अण्णासाहेब माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार किशोर पाटील ,माजी आमदार नामदेव पवार, अमरसिंह पंडित,  बदामराव पंडित, माजी महापौर नंदकूमार घोडेले, उद्योजक अर्जुन गायके, मसीआ संघटनेचे पदाधिकारी पाणी हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

मराठवाड्यातील जनतेला गृहीत धरू नयेयावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, मराठवाड्यातील जनतेला राज्य सरकारने गृहीत धरू नये. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय हे पाणी 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान सोडणे आवश्यक होते. मात्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकर्ते संचालकांनी 30 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन 20 दिवस उलटले तरी अद्याप 8.6 टीएमसी पाणी दिले गेले नाही.

आता शांत बसणार नाही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाण्याची गरज आहे. असे असताना अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मुद्दामहून आपले पाणी रोखून धरले याचा फटका गोरगरीब जनता शेतकरी उद्योजक यांना बसणार आहे. यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही, असा इशारा आमदार संजय शिरसाठ यांनी दिला. तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर मराठवाड्यातील एकाही आमदाराने हिवाळी अधिवेशनात सहभागी होऊ नये असे आवाहनही शिरसाठ यांनी घ्यावी केले. 

संयम सुटत चालला आहेअर्जुन खोतकर म्हणाले, मराठवाड्यातील जनता शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारी आहे. संतांच्या भूमितील असल्यामुळे आधी विनंती केली, निवेदने दिली परंतु, पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे आता आमचा संयम सुटत चालला आहे. जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद