राजीव सातव यांना विशेष प्रचार यंत्रणेमुळे मिळाले यश

By Admin | Updated: May 19, 2014 00:15 IST2014-05-18T23:48:57+5:302014-05-19T00:15:52+5:30

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून विजय मिळविलेले काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी प्रचारासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या टीम तयार

Rajiv Satav got his special promotional system | राजीव सातव यांना विशेष प्रचार यंत्रणेमुळे मिळाले यश

राजीव सातव यांना विशेष प्रचार यंत्रणेमुळे मिळाले यश

 हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून विजय मिळविलेले काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी प्रचारासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या टीम तयार करून विशेष प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळेच त्यांना विजय मिळविता आला. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद गेल्या चार वर्षापासून यशस्वीपणे सांभाळणार्‍या आ. राजीव सातव यांनी नवी दिल्ली येथे राहून प्रत्येक राज्यात निवडणूक प्रचाराच्या वेळी कशी यंत्रणा राबविली जाते? याचा चांगलाच अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या प्रचाराच्या वेळी वेगवेगळे प्रयोग करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला चांगलेच यश मिळाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरीता त्यांनी विशेष टिम तयार केल्या. त्यानुसार वसमत विधानसभेची जबाबदारी दत्तराव लोंढे व सुनील पाटील गोरेगावकर यांच्याकडे सोपविण्यात आली. प्रारंभी येथे काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मिलिंंद यंबल यांनीही प्रचाराची व्युव्हरचना केली. त्यानुसार प्रचारही सुरू केला; परंतु त्यांच्यावर सातव यांनी सर्व मतदारसंघातील प्रचाराच्या समन्वयाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी यंबल यांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करून यशस्वीपणे पार पाडली. कोठे अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे? कोणता स्थानिक नेता नाराज आहे? आदी बाबी ओळखून यंबल यांनी संबंधितांची नाराजी दूर केली व त्यांना काँग्रेसच्या बाजूने वळविले. हिंगोली विधानसभेची जबाबदारी अजित मगर व बाळासाहेब मगर यांच्यावर होती. तर कळमनुरी आणि किनवट विधानसभेची जबाबदारी डॉ. संतोष टारफे व रमेश जाधव यांच्यावर होती. त्यांनीही ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली. विशेषत: डॉ. टारफे यांनी आपले कसब पणाला लावून मतांची आकडेवारी काँग्रेसच्या बाजूने कशी वाढेल? याकडे लक्ष दिले. उमरखेड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी बाबा नाईक व दिलीप देसाई यांच्यावर होती. त्यांनीही सातव यांचा विश्वास सार्थ ठरविला. हदगाव विधानसभेची जबाबदारी संजय बोंढारे व धनंजय पाटील यांच्यावर होती. त्यांनीही ही जबाबदारी परिपुर्णपणे निभावण्याचा प्रयत्न केला. या सर्व टीम स्थानिक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होत्या. या शिवाय उमरखेड व कळमनुरी विधानसभा मतदार संघाकरीता दिल्ली येथील १० जणांची विशेष टिम वेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवित होती. मतांची आकडेवारी जुळविणे, प्रचारांकरीता वाहने व अन्य साहित्य उपलब्ध करून देणे आदी कामेही वाटून देण्यात आली होती. विशेष म्हणजे दिवसभर केलेल्या प्रचाराचा रात्री उशिरा आ. सातव स्वत: आढावा घेत. काँग्रेसची पारंपारिक मते कायम कशी राहतील. व शिवसेनेच्या बाजूने जाणारी मते काँग्रेसकडे कसे वळतील याची पुरेपूर खबरदारी सातव यांनी घेतली. या नियोजनबद्ध प्रचारामुळे त्यांना यश मिळविता आले. (जिल्हा प्रतिनिधी) दिल्लीतील कसब लावले पणाला गेल्या चार वर्षांपासून अखिल भारतीय युवक काँंग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत असता देशभरात झालेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या पद्धतीचा अभ्यास करून सातव यांनी या लोकसभा निवडणुकीत वापरली प्रचाराची वेगळी पद्धत. काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी विधानसभा मतदार संघांच्या समन्वयकाची महत्वपूर्ण भूमिका निभावली. कळमनुरी व उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी दिल्ली येथील १० जणांच्या विशेष पथकाने घेतले परिश्रम. मतांची आकडेवारी काँग्रेसच्या बाजुने वाढावी, यासाठी टिममधील प्रत्येक सदस्याने घेतली खबरदारी.

Web Title: Rajiv Satav got his special promotional system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.