शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राजूरला महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

By admin | Updated: June 27, 2014 00:13 IST

राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली.

राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली. यावर सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी येत्या दोन दिवसांत सुरळीत पाणी पुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर येथील बसस्थानका समोरील वार्ड क्रमांक १ मधील रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. अलिकडे राजूरात भीषण पाणी समस्या निर्माण झाल्याने खासगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. या भागात बहुतांशी नागरिक मजूरी करून उदरनिर्वाह भागवतात, त्यांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. त्यातच ग्रामपंचायतच्या चुकीच्या नियोजनामुळे या भागात गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद आहे. सध्या पावसाळा असूनही कडक ऊन आहे. भर उन्हात महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. त्रस्त महिलांनी आज अचानक ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतप्त महिलांनी गावाता पाणीपुरवठा होत असतांना आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतचे पदाधिकारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला. यावेळी सरपंच शिवाजीराव पुंगळे यांना निवेदन देण्यात आले. सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी विहीरीतून पाण्याचा दाब कमी झाल्याने पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही, आता येत्या दोन दिवसांत या वार्डात आपण जातीने लक्ष घालून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)भटकंती कायमदरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे गावातील आबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.