शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

राजूरला महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

By admin | Updated: June 27, 2014 00:13 IST

राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली.

राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली. यावर सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी येत्या दोन दिवसांत सुरळीत पाणी पुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर येथील बसस्थानका समोरील वार्ड क्रमांक १ मधील रहिवाशांना गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. अलिकडे राजूरात भीषण पाणी समस्या निर्माण झाल्याने खासगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. या भागात बहुतांशी नागरिक मजूरी करून उदरनिर्वाह भागवतात, त्यांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. त्यातच ग्रामपंचायतच्या चुकीच्या नियोजनामुळे या भागात गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद आहे. सध्या पावसाळा असूनही कडक ऊन आहे. भर उन्हात महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. त्रस्त महिलांनी आज अचानक ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संतप्त महिलांनी गावाता पाणीपुरवठा होत असतांना आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतचे पदाधिकारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला. यावेळी सरपंच शिवाजीराव पुंगळे यांना निवेदन देण्यात आले. सरपंच शिवाजीराव पुंगळे यांनी विहीरीतून पाण्याचा दाब कमी झाल्याने पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही, आता येत्या दोन दिवसांत या वार्डात आपण जातीने लक्ष घालून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)भटकंती कायमदरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे गावातील आबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.