शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचे स्मारक उभारणार

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच

कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच वाटचाल करण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. जिल्ह्यातील कसबे-तडवळे येथे बाबासाहेबांचा पावनस्पर्श झाला आहे. त्यामुळे तेथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणाही यावेळी चव्हाण यांनी केली.कळंब नगर परिषदेच्या वतीने शहरातील पं. जवाहरलाल नेहरू बालोद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र भिख्खू संघाचे उपाध्यक्ष भंत्ते उपगुप्त महाथेरो, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, पं.स. सभापती छायाताई वाघमारे, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, माजी आमदार दयानंद गायकवाड, यशपाल सरवदे, दगडू धावारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, डॉ सुनील गायकवाड, ब्रिजलाल मोदाणी, जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, आप्पासाहेब शेळके, भागवत धस, पांडुरंग कुंभार, शिल्पकार निरंजन मडिलगेकर आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची चौकट बळकट करण्याचे कार्य राज्यघटनेच्या माध्यमातून केले. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना समान संधी देणारे ‘एक व्यक्ती, एक मत’ हे धोरण त्यांनी अवलंबिले. सर्वसामांन्या केंद्रबिंद मानून त्यांनी काम केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश त्यांनी दिला. या महामानवाचा पुतळा उभा करून कळंब नगर परिषदेने शहरवासियांची मागील पंचेवीस वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळत राहिल, असा विश्वास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)