शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

वराहपालन शहराबाहेर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

औरंगाबाद : शहरातील अनेक नागरी वसाहतींमध्ये अनधिकृतपणे वराहपालन सुरू आहे. महापालिकेने वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत वराहांचा मुक्काम मनपा ...

औरंगाबाद : शहरातील अनेक नागरी वसाहतींमध्ये अनधिकृतपणे वराहपालन सुरू आहे. महापालिकेने वराहपालकांना १५ दिवसांची मुदत देत वराहांचा मुक्काम मनपा हद्दीबाहेर हलविण्याची सूचना केली आहे. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

मनपा हद्दीत अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे वराहपालन सुरू केले आहे. त्यांच्याकडून नागरी वसाहतींमध्ये नाल्यात वराह मोकाट सोडून देण्यात येतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा त्रास वाढला आहे. याविरोधात महापालिकेकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता या तक्रारींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने वराहपालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व वराहपालकांना त्यांच्या वराहांना मनपा हद्दीबाहेर इतरत्र हलविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

शहरातील जवळपास सर्वच भागांत वराहपालन सुरू आहे. त्यात औरंगपुरा नाला, नारळीबाग नाला, मध्यवर्ती बसस्थानक, फाजलपुरा, बेगमपुरा, विद्यापीठ परिसर, शांतीपुरा, सातारा परिसर आदी भागांतील नाल्यांत मोकाट वराहांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरात दहा हजारांहून अधिक वराह

महापालिका हद्दीत सुमारे १० हजारांहून अधिक वराह असल्याचा अंदाज मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वराहांना शहराबाहेर हलविण्यासाठी याआधीही प्रयत्न झाले. मात्र, त्यावेळी वराह पालकांच्या संघटनेने महापालिकेसमोर उपोषण केले. आधी आम्हाला बाहेर जागा उपलब्ध करून द्या, मगच आम्हाला हलवा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर मनपाकडून वराह बाहेर हलविण्याची प्रक्रिया थांबली होती.