शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

ये रे.. ये रे.. पावसा ! मराठवाड्यात ढग नसल्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला विश्रांती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 17:49 IST

मराठवाड्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे४२०. मि. मी. आजवर पाऊस होणे अपेक्षित होते.६६ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नाही.

औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली असली तरी चार दिवसांतच प्रयोगाला ढगांअभावी विश्रांती घ्यावी लागली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी प्रयोग झाला नाही; परंतु विमानाचे उड्डाण यशस्वी झाले होते. दुसऱ्या दिवशी प्रयोगासाठी हव्या असलेल्या ढगांची गर्दी नसल्याने विमानाने उड्डाण भरले नाही. रविवारी पैठण, जालना, औरंगाबाद तालुक्यांतील काही भागांवर दोन विमान फिरले. एरोसोल्सने फवारणी केली. परंतु पाऊस होण्यावर त्याचा परिणाम झाला नाही. मराठवाड्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे. विभागात आजवर १२७.३१ मि.मी. पावसाची तूट आहे.

सोमवारी प्रयोग करण्यासाठी विमान उड्डाण घेईल, त्याचे काही परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु वैमानिकांनी सोमवारी विश्रांती घेतली. त्यामुळे सकाळी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांची बैठक झाली नाही. परिणामी उड्डाण होऊ शकले नाही. मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होऊन प्रयोगाबाबत निर्णय होणार आहे. सोमवारी विश्रांती घेतल्यामुळे आता मंगळवारी प्रयोग होणार असल्याचे विभागीय महसूल उपायुक्त सतीश खडसे यांनी सांगितले. ३० सप्टेंबरपर्यंत प्रयोगाच्या अनुषंगाने दररोज सकाळी ११ वाजता आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञांच्या बैठकी होतील. रविवारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुपारी दीड वाजता चिकलठाणा विमानतळावरून विमान उडाले. तीन तालुक्यांवर विमानाने मेघबीजरोपण (एरोसोल्स) केले. मात्र त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती समोर आली नाही.

दमदार पावसाची अपेक्षा मराठवाड्यातील बहुतांश धरणे अजून मृतसाठ्यातच आहेत. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडी धरण ९० टक्के  भरले आहे.जायकवाडी वगळता मराठवाड्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे. मराठवाड्यावर वरुणराजाने वक्रदृष्टी केल्यामुळे ९ आॅगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. अजून तरी त्या प्रयोगातून काही हाती लागलेले नाही.७७९ मि.मि. विभागाची पावसाची सरासरी४२०. मि. मी. आजवर पाऊस होणे अपेक्षित होते.१२७.३१ मि.मी. पावसाची सध्या तूट आहे.२९२.८४ मि.मी. इतका पाऊस आजवर झाला आहे.६६ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नाही.३७.५ इतकाच पाऊस आजवर झालेला आहे

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण