शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

दिलासा ! मराठवाड्यात सर्वदूर पाऊस; दुबार पेरणीचे संकट टळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 07:54 IST

पंधरवड्यानंतर बळीराजाला दिलासा; जालन्यातील नऊ मंडळांत अतिवृष्टी

ठळक मुद्देऔरंगाबाद शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी हलकासा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात रविवारी रात्रभर भीज पाऊस झाला.  गेल्या २४ तासांत सरासरी २५ मि.मी. पाऊस झाला

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : पंधरवड्यानंतर पावसाने मराठवाड्यात सर्वदूर  हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून नदी, नाले फुगले आहेत.  

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी हलकासा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात रविवारी रात्रभर भीज पाऊस झाला.  गेल्या २४ तासांत सरासरी २५ मि.मी. पाऊस झाला. बीड जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.  उस्मानाबाद  जिल्ह्यातील भूम, उमरगा, कळंब या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोली  जिल्ह्यात सरासरी २०.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  नांदेड जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे दमदार पाऊस झाला. लातूर शहर व जिल्ह्यातही सोमवारी हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत रविवारी रात्री  अतिवृष्टी झाली. सोमवारी सायंकाळी जालना शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस  झाला. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्त टळले आहे. 

पालघरमध्ये वीज पडून मुलाचा मृत्यू  n डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने झाडावर चढून मोबाईल पाहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचा झाडावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. तर यात तीन मुले जखमी झाली असून, यातील एकाची स्थिती गंभीर आहे. n उंबराच्या झाडावर वीज पडल्याने रविन कोरडा (१६) याचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी