शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

औरंगाबादमधील ‘पिटलाईन’च्या उत्तरासाठी रेल्वेला दोन आठवडे मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:37 IST

या जनहित याचिकेची पुढील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातून नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी ‘पिटलाईन’ची (रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीचा ट्रॅक) मंजुरी मिळण्याकरिता दाखल याचिकेच्या अनुषंगाने उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्याची विनंती रेल्वे प्रशासनाच्या वतीने अ‍ॅड. मनीष नावंदर यांनी शुक्रवारी (दि.१९ आॅक्टोबर) केली. त्यावरून औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी त्यांची विनंती मंजूर केली. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. 

येथील विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीने अनेक बैठकांमध्ये औरंगाबाद विभागातून नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी औरंगाबाद, नगरसोल, चिकलठाणा आणि करमाड या चारपैकी एका रेल्वेस्थानकालगत ‘पिटलाईन’ मंजूर करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला दिला होता. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासी संघटना, मराठवाडा रेल्वेविकास समिती, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना आदी संघटनांनीही वरीलप्रमाणे प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविले होते.

त्यावरून नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी तज्ज्ञांची समिती नेमून वरील स्थळांची पाहणी करून आर्थिक आणि वास्तव अहवाल तयार करून चिकलठाणा येथे ‘पिटलाईन’ प्रस्तावित केली होती. रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी तयार केलेला प्रस्ताव २८ सप्टेंबर २०१७ ला रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता; परंतु रेल्वेमंत्र्यांनी अशी पिटलाईन टाकणे व्यवहार्य नसल्याचे स्थानिक खासदारांना कळविले होते. पुढे तो प्रस्ताव गुंडाळला गेला.म्हणून विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे माजी सदस्य मंगेश कपोते यांनी अ‍ॅड. अजित कडेठाणकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद विभागातून अधिकच्या रेल्वे सुरू झाल्यास रेल्वेचा महसूल वाढेल, येथील दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी), वाढते औद्योगिक क्षेत्र, राज्याची पर्यटन राजधानी, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र, उच्च न्यायालय आदींचा विचार करता औरंगाबाद विभागातून अधिकच्या रेल्वे सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘पिटलाईन’ची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. औरंगाबादची गरज पाहता मुंबईसाठी मनमाडला १२ तास उभ्या असणाऱ्या पंचवटी आणि राज्य राणी एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत आणल्यास औरंगाबादहून मुंबईसाठी दोन अतिरिक्त  रेल्वे मिळतील.

देशातील इतर भागांत जाण्यासाठी नांदेड येथून २४ ची मान्यता असताना १८ बोगींसह धावणाऱ्या श्रीगंगानगर, पटणा, संत्रागच्छी या रेल्वे औरंगाबादपर्यंत वाढविता येऊ शकतात. रेल्वे मंत्रालयाने कुठलेही संयुक्तिक कारण न देता २०१७ साली फेटाळलेल्या पिटलाईनच्या प्रस्तावाचा सकारात्मक फेरविचार करून चिकलठाणा येथे पिटलाईनला मंजुरी द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCentral Governmentकेंद्र सरकार