आरोग्य उपसंचालक कार्यालयात बदल्यांवरून राडा
By Admin | Updated: June 12, 2014 01:34 IST2014-06-12T01:17:47+5:302014-06-12T01:34:14+5:30
औरंगाबाद : बदली प्रकरणावरून स्टाफ नर्सचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील लिपिकाशी जोरदार भांडण झाले व त्याचे पर्यवसान दोघांनीही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात झाले.

आरोग्य उपसंचालक कार्यालयात बदल्यांवरून राडा
औरंगाबाद : बदली प्रकरणावरून स्टाफ नर्सचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील लिपिकाशी जोरदार भांडण झाले व त्याचे पर्यवसान दोघांनीही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात झाले.
आरोग्य विभागाने औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या स्टाफ नर्सच्या बदल्यांच्या दिलेल्या आदेशात आपले नाव नसल्यामुळे संतप्त झालेली स्टाफ नर्स जालना येथे बदली मिळण्यासाठी आठ दिवसांपासून उपसंचालक कार्यालयात खेट्या मारत आहे.
जिंतूर (जि. परभणी) येथे गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या या नर्सने जालना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बदलीसाठी अर्ज केला होता. नियमांनुसार तुमच्या बदलीचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाने शासनाकडे पाठविला. लिपिक शिवाजी नवले यांनी उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रस्ताव तयार केला होता.
३१ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये तिचा समावेश नव्हता. त्यामुळे ही नर्स संतप्त होती. आठ दिवसांपूर्वी ती उपसंचालक कार्यालयात आली होती. बुधवारी दुपारी ती पुन्हा कार्यालयात गेली. तेथे नवले यांच्याशी तिचा वाद झाला. त्यात त्यांनी परस्परांना शिवीगाळ केली. यानंतर नर्सने सहायक संचालक डॉ. डी. एन. पाटील यांच्या कार्यालयात जाऊन नवलेविरुद्ध तक्रार केली.
डॉ. पाटील तिला समजावून सांगत असतानाच कार्यालयीन सर्व कर्मचारी काम बंद करून तेथे आले. त्यांनी त्या नर्सवर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, नर्सने नवलेंविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी उपसंचालक कार्यालयातून नवले यांना ठाण्यात नेले. मागोमाग उपसंचालक कार्यालयातील कर्मचारीही ठाण्यात गेले. तेथे नवले यांनीही त्या नर्सविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली.
मी तेव्हा तेथे नव्हतो
या प्रकाराविषयी डॉ. डी. एन. पाटील म्हणाले की, हे प्रकरण घडले तेव्हा मी कार्यालयात नव्हतो. तसेच पद रिक्त नसेल तर तेथे बदली क रता येत नाही. त्यामुळे त्यांची बदली झाली नाही. आता प्रकरण पोलिसांत गेले आहे.