शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रबीला हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ कमी पाण्यावर उत्पादन देणारे हरभरा पीक असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली आहे़रब्बी हंगामामध्ये लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे सरासरी क्षेत्र १,८७,१६७ क्षेत्रापैकी सहा तालुक्यातील ४,१४७ हेक्टरवर रबी पिकाची पेरणी झाली़ यामध्ये ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई आदी पिकांचा समावेश आहे़ लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभरा, ७५ हेक्टरवर ज्वारी व १२ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी झाली़ औसा तालुक्यामध्ये २० हेक्टरवर ज्वारी, ३० हेक्टरवर मका, २१० हेक्टरवर हरभरा, ५ हेक्टरवर करडई, २ हेक्टरवर जवस, ५ हेक्टरवर सुर्यफुल व ३ हेक्टरवर इतर पिकाची पेरणी करण्यात आली़ चाकूर तालुक्यात ६९ हेक्टरवर ज्वारी, २६ हेक्टरवर मका, २ हेक्टरवर गहू, १२ हेक्टरवर करडई याप्रमाणात रबी पिकाची परेणी करण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, २५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई व ७ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करण्यात आली़ शिरुर अनंतपाळ तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, १५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई तर ९ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करतण्यात आली़ रेणापूर तालुक्यात ५९० हेक्टरवर ज्वारी २,१२६ हेक्टरवर हरभरा, ७७१ हेक्टरवर करडई या प्रमाणात ४,१४७ हेक्टर क्षेत्रावर रबीची पेरणी करण्यात आली़ यामध्ये ज्वारी, गहु, सुर्यफुल, करडई, हरभरा आदी पिकामध्ये ३६९ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ तर जळकोट, अहमदपूर, देवणी व उदगीर या तालुक्यात मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अद्यापही पेरण्या निरंक आहेत़ (प्रतिनिधी)रबी हंगामामध्ये अल्पशा पावसावर ६ तालुक्यात ४१४७ हेक्टरवर पेरण्या झाल्या़ परंतु उर्वरित ४ तालुक्यातील पेरण्या मात्र निरंक आहेत़ परंतु पेरणीचा कालावधी १५ नोव्हेंबर पर्यंतचा असल्याने शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ यासाठी खरीप व रबी हंगामासाठी १०० मिलीमिटर पावसाची गरज आहे़रबी हंगामात ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई, मका व इतर कडधान्य पिकामध्ये हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक झाला आहे़ यामध्ये औसा तालुक्यात २१०, चाकूर तालुक्यात २३१, निलंगा तालुक्यात २५, शिरुर अनंतपाळ तालुक्यात २५, लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली़ तर रेणापूर तालुक्यात २१२६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाल्याने रेणापूर तालुक्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाल्याचे समोर आले आहे़