रबीचा पेरा ५ टक्क्यांनी घसरला

By Admin | Updated: January 6, 2015 01:09 IST2015-01-06T00:29:29+5:302015-01-06T01:09:09+5:30

बीड : यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम खरीपातील उत्पादनावर तर रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रबी हंगामातील पेरणीमध्ये घट झाली आहे.

Rabi pulses dropped by 5 percent | रबीचा पेरा ५ टक्क्यांनी घसरला

रबीचा पेरा ५ टक्क्यांनी घसरला


बीड : यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम खरीपातील उत्पादनावर तर रबी हंगामातील पेरणीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रबी हंगामातील पेरणीमध्ये घट झाली आहे. गतवर्षी सरासरी ऐवढे पर्जन्यमान होऊनही जिल्ह्यात रबीची पेरणी ६७ टक्के ऐवढी झाली होती. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना सरासरी क्षेत्रापैकी ६२ टक्के क्षेत्रावर रबीचा पेरा झाला आहे.
ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून त्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ४३ हजार ३०० हेक्टर असून त्यापैकी १ लाख ४५ हजार सातशे हेक्टरवर ज्वारीचा पेरा करण्यात आला आहे. या हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, जवस, सुर्यफूल, तीळ आदींची लागवड केली जाते. गतवर्षी सरासरी इतका पाऊस होऊनही ६७ टक्केच रबीची पेरणी झाली होती. यंदा पर्जन्यमान ५० टक्क्यावरच येऊन ठेपले असले तरी अशादायी शेतकऱ्यांनी ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी पाणीटंचाईचे सावट संपूर्ण रबीवर जाणवू लागले आहे. रबीतील पिके बहरात असतानाच अवकाळी पावासाने काही पिकांना आधार भेटला आहे तर काहींना धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने नगदी पिकांपेक्षा जनावरांना चारा होईल अशा पिकांचीच लागवड अधिक प्रमाणात केली आहे. तर जास्त पाणी व निघराणीत ठेवावी लागणाऱ्या पिकांकडे यंदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)४
दुष्काळी परिस्थितीचा फटका गहू उत्पादनावर अधिक झाला आहे. सरासरी ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १५ हजार दोनशे हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी ३० हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली होती.

Web Title: Rabi pulses dropped by 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.