शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

औरंगाबादमधील तीन ऐतिहासिक दरवाजांचा प्रश्न निर्णायक वळणावर; महानगरपालिकेला केव्हा जाग येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:31 PM

शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

ठळक मुद्देपूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी सकाळी महेमूद गेटचे काही अवशेष कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरवाजांना लागून असलेले पूलही कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे. पूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? असा संतप्त सवाल औरंगाबादकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महेमूद गेटशुक्रवारी सकाळी पाणचक्कीजवळील महेमूद गेटच्या आतील लाकडी दरवाजाही निखळला. गेटचे अवशेषही खिळखिळे झाले असून, तेसुद्धा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. गेटला लागून असलेल्या पुलाची अवस्थाही अत्यंत विदारक आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी करण्यात आली. १७३० मध्ये पूल बांधण्यात आला. पाणचक्की येथील शाह सईद तिलंग पोश, त्यांचे पुतणे बाबा शाह मुसाफीर या बुर्जुग मंडळींचे शिष्य महेमूद शाह मुसाफीर यांनी तेव्हा २० हजार रुपये खर्च करून पाणचक्की, पूल, गेटची उभारणी केली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याचा निर्वाळा देण्यात आला असतानाही वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे महेमूद दरवाजा दिवसेंदिवस खिळखिळा होत आहे. 

बारापुल्ला गेटमिलकॉर्नरपासून हाकेच्या अंतरावर खाम नदीवर उभा असलेला गेट म्हणजे बारापुल्ला गेट होय. या गेटला लागूनच मोठा ऐतिहासिक पूल आहे. छावणी, भावसिंगपुरा भागातील दीड ते दोन लाख नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. ज्या पद्धतीने गेटची अवस्था झाली आहे, त्यापेक्षा कितीतरी वाईट अवस्था बारापुल्ला या ऐतिहासिक पुलाची झाली आहे. हा पूलही धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत यावरील वाहतूक थांबविलेली नाही. या पुलावर किंवा दरवाजात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता इतिहासप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.

मकाई गेटघाटीजवळील ऐतिहासिक गेट म्हणजे मकाई गेट होय. औरंगजेब यांच्या काळात गेट आणि पुलांची उभारणी करण्यात आली आहे. खाम नदीवर सर्वात मोठा पूल आहे. याची उंचीही इतर पुलांपेक्षा खूप जास्त आहे. मकबऱ्याकडे जाणारे असंख्य पर्यटक याच गेट आणि पुलावरून ये-जा करतात. हा पुल धोकादायक झाल्याने भविष्यात दुर्घटना होऊ शकते. 

योजना कागदावरचमागील दहा वर्षांपासून महेमूद गेट, बारापुल्ला गेट, मकाई गेट येथे दोन्ही बाजूने रस्ता करावा. पुलांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने ११ कोटी रुपये पुलांसाठी जाहीर केले होते. हा निधी शहरापर्यंत आलाच नाही. महापालिकेकडे निधी नाही. पुलांची उभारणी करण्यासाठी राजकीय मंडळी शासनाकडे पाठपुरावा करायला तयार नाही. या तिन्ही दरवाजांमध्ये महाडसारखी दुर्घटना घडल्यास शासन आणि महापालिकेला जाग येणार आहे का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणroad safetyरस्ते सुरक्षा