उपचाराविना जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

By Admin | Updated: May 30, 2014 00:28 IST2014-05-30T00:14:01+5:302014-05-30T00:28:35+5:30

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़

The proportion of animals without treatment is increased | उपचाराविना जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

उपचाराविना जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

 श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़ यापैकी ३ गायी मृत्यूमुखी पडल्या़ माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील शेतकरी विक्रम सुंदरसिंग राठोड यांनी त्यांच्या शेतात शेनखत मिळावे या हेतुने नजिकच्या ४ ते ५ गावांतील शेतकर्‍यांची ११० गायी, बैल चारा व इतर सुविधा देवून शेतात आणले होते़ गायी चरत असताना शेजारील शेतात उगवलेले ज्वारीचे पिल (कोवळे झाड) दिसल्याने २० ते २५ गायींनी ते खाल्ले़ त्यानंतर या गायींना विषबाधा झाल्याने त्यातील तीन गायी अत्यवस्थ झाल्या़ राठोड यांनी आष्टा येथील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़चेपुरे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होत नसल्याने त्यांनी त्या गायींना त्याच अवस्थेत सोडून पशूचिकित्सालय गाठून कंपाऊंडरला घटनास्थळी आणले़ तोपर्यंत ३ गायी दगावल्या़ त्यानंतर खासगी पशू चिकित्सकांची मदत घेवून गायी, बैलांवर उपचार करण्यात आले़ माहूर तालुक्यातील चोरड, आष्टा, साईनगर, पार्डी, हिवळणी येथे जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या असून प्रत्येकवेळी पशू वैद्यकीय अधिकार्‍यांची हलगर्जी समोर आल्याने या पशूवैद्यकीय अधिकार्‍यांवर सदोष प्राणीवधाचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विक्रम राठोड यांनी केली आहे़ (वार्ताहर)

Web Title: The proportion of animals without treatment is increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.