शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

विद्यापीठाचा स्तुत्य निर्णय; अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क केले माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 13:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपत्तीग्रस्तांना दिलासा देणारे राज्यातील पहिले विद्यापीठ 

ठळक मुद्देकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मांडला ठराव व्यवस्थापन परिषदेत झाला निर्णय  ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४२ विभाग आणि उस्मानाबाद येथील १० विभागांत शिक्षण घेत असलेल्या दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा ठराव कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला. त्यास सर्वांनुमते मंजुरी देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने कळविली आहे. या ठरावामुळे विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपयांचे शैक्षणिक शुल्क माफ होणार आहे. असा निर्णय घेणारे हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यात अगोदर दुष्काळ आणि आता अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार अजेंड्यावर नसताना कुलगुरू  डॉ. प्रमोद येवले यांनी  शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ठराव मांडला. विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील ४२ विभाग व उस्मानाबाद उपपरिसरातील दहा विभागांतील ५ हजार ८९ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

बैठकीत कुलगुरू म्हणाले की, मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांवर संकट आले आहे. आपले विद्यापीठ कष्टकरी कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणून ओळखले जाते. या मुलांसाठी ‘कमवा व शिका’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या विद्यार्थ्यांचे २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्क माफ करावे, असा ठराव मांडला. यानंतर सर्वच सदस्यांनी या ठरावाला अनुमोदन देत तो बहुमताने मंजूर केला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे म्हणाले की, आम्ही हा ठराव मांडणार होतो. मात्र, कुलगुरूंनीच अतिवृष्टीची दखल घेत ठराव मांडला, हे कौतुकास्पद पाऊल आहे. त्याचे स्वागत करतो, असे स्पष्ट केले.बैठकीला प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. भालचंद्र वायकर, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. हरिदास विधाते, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. राहुल मस्के, डॉ. नरेंद्र काळे, सुनील निकम, डॉ. अशोक देशमाने, संचालक डॉ. सतीश देशपांडे, राजेंद्र मडके, डॉ. गणेश मंझा आदींची उपस्थिती होती. 

शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणीशासन निर्णयाप्रमाणे दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार संबंधित गावांतील विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल.-डॉ. प्रवीण वक्ते, प्रकुलगुरू

सामाजिक बांधिलकीतून निर्णयभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठात शोषित, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, शेतकरी समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी येतात. यावर्षी सुरुवातीला दुष्काळ आणि आता अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह इतर भागातील शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट आले आहे. या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहावे, यासाठी सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे.-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा