शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

रावसाहेब दानवेंच्या विरोधात प्रहारचा दुसऱ्या दिवशीही जलकुंभावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 14:39 IST

Agitation Against Raosaheb Danve in Aurangabad आंदोलकांनी दानवे यांचे प्रतीकात्मक दोन पुतळे जाळले,अंगावर रॉकेल ओतत घोषणाबाजी

ठळक मुद्दे शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन   शुक्रवारी आंदोलनस्थळी तहसीलदार दत्ता भारसकर यांनी आंदोलकांची भेट घेतली

औरंगाबाद : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी  मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे २५ ते ३० कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी शिवाजीनगर येथील जलकुंभावर सुरु केलेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरुच आहे. शुक्रवारी आंदोलनस्थळी तहसीलदार दत्ता भारसकर आले. त्यांनी आंदोलंकांशी चर्चा केली. यात काही निष्पन्न झाले नसून  आंदोलक पालकमंत्र्यांची भेट घालून द्या या अटीवर अडून बसले आहेत. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून शिवाजीनगर जलकुंभावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी धाव घेतली.  आंदोलकाशी चर्चा करण्यासाठी ते  जलकुंभावरुन  चढू लागले. मात्र आंदोलक आक्रमक झाल्याने त्यांना तेथून परतावे लागले. आंदोलकापैकी काही जण कपडे काढून घोषणा देत होते तर काही जण  तेथे पडलेले प्लास्टीक कुलरचे खोके आणि लाकडी बॉक्स जाळून लक्ष वेधून घेत होते.  आंदोलकांनी पोलीस आणि जनतेचे लक्ष वेधून घेत दानवे यांचे दोन पुतळे जाळले. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले; परंतु अन्य कार्यकर्त्यांनी त्याला रोखले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची जोरदार घोषणाबाजी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड आदी सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

जलकुंभाखाली पोलिसांचा खडा पहारा 

गुरुवारी पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही. विनंती करूनही आंदोलक जलकुंभावरून खाली उतरत नसल्यामुळे  शेवटी  पोलिसांनी जलकुंभाखाली राहुटी लावून तेथे खडा पहारा सुरू ठेवला. आंदोलकांना कसे उतरावे याचा विचार पोलीस करत होते. दरम्यान, खाली असलेल्या आंदोलकांना पकडले तर जलकुंभावरील  आंदोलक टोकाचे पाऊल उचलतील, अशी पोलिसांना भीती होती. पोलिसांसमोर आंदोलकांनी दानवे यांचे  दोन पुतळे जलकुंभावर नेले. पोलिसांनी त्यांना अडविले नाही.  जलकुंभावर पुतळे नेऊन जोरदार घोषणा देत जाळले. 

जलकुंभावर झोपण्यासाठी कंबळ जलकुंभावर चढून दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन  मागण्या मान्य न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही सुरूच आएह. गुरुवारी रात्री आंदोलकांनी जलकुंभावर पिण्याच्या पाण्याचे जार नेले. रात्री ९:३० वाजता ९ ते १० आंदोलक खाली उतरले आणि उर्वरित आंदोलकांसाठी जेवण घेऊन गेले. थंडीचा त्रास होऊ नये याकरिता आंदोलकांना कंबळ देण्यात आल्या.

काय आहेत मागण्या शेतकरीविरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करा. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी